शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

33 हजार लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेची मेहनत, स्वयंसेवी संस्थांची धडपड अन् रुग्णांची इच्छाशक्ती हेच औषध

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या अत्र-तत्र-सर्वत्र कोरोनाने भयकंप उडविला आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ३९ हजार लोकांना या विषाणूने ‘बाटविले’ हे खरेच आहे. पण त्याहीपेक्षा जास्त लोकांनी कोरोनालाच हरविले, हेही दिलासादायक वास्तव आहे. संशयास्पद वाटलेल्या तब्बल सव्वातीन लाख लोकांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यातील तीन लाख नागरिकांना कोरोनाचा स्पर्शही झाला नसल्याचे अहवालात सिद्ध झाले. याचाच अर्थ, कोरोना जवळपास येऊनही तीन लाख लोकांनी त्याला यशस्वीपणे हुलकावणी दिली; तर ज्या ३९ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्यातील तब्बल ३३ हजार लोकांनी अवघ्या आठवडाभरात कोरोनावर मात केली. आरोग्य यंत्रणेची रात्रंदिवस धडपड अन् रुग्णांची स्वत:ची इच्छाशक्ती हेच कोरोनावर पहिले औषध ठरले. ‘पाॅझिटिव्ह’ या चांगल्या शब्दाची विनाकारण दहशत माजविणाऱ्या कोरोना संकटातील ही खरीखुरी पाॅझिटिव्ह स्टोरी आहे. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये पैदा झालेला कोरोना हळूहळू देशात आला. मार्च २०२० मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यात एन्ट्री केली. तेव्हापासून तर आजपर्यंत या न दिसणाऱ्या विषाणूने सर्वसामान्य माणसांचे सुखचैन हिरावले आहे. पोलीस व्हॅनपेक्षाही रुग्णवाहिका पाहून लोकांना भीती वाटू लागली. धंदे बुडाले, रोजगार गेले, व्यापार थांबला, कोरोनाच्या आजारापेक्षाही मानसिक आजारांनी अनेकांना पछाडले. रोज येणारे रुग्णवाढीचे आकडे लोकांना घाबरवून सोडत आहेत. पण त्यासोबतच रोज कोरोनामुक्त होणाऱ्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? एकदा स्वत:लाच विचारून बघा. आपल्याला यापूर्वी कधीच ताप आला नव्हता? खोकला झाला नव्हता? झालाच होता. आपण अनेकदा रुग्णालयात राहून आलो. बरे झालो. मग कोरोना आला म्हणून एवढे हतबल वाटून घेण्याचे कारण नाही. आपल्या एखाद्या मित्राला साधा खोकला आला म्हणून मनात शंकेची पाल चुकचुकू द्यायची नाही. कोरोनाला हरविण्याचे साधे नियम आहेत. तेही विनापैशाचे. गर्दी करायची नाही, एकमेकांपासून थोडे अंतर राखायचे, वारंवार हात धुवायचे, तोंडावर मास्क लावायचा, जरा शंका वाटली, तर तपासणी करून घ्यायची... बस्स! २७ लाख ७५ हजार लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ३९ हजार नागरिकांना कोरोना झाला. त्यातील ३३ हजार ३३४ लोक ठणठणीत बरेही झाले. त्यामुळे कोरोनाला घाबरून रोजचे जगणे अवरुद्ध करून घेण्यात काहीच हशील नाही. उलट, शासनाने घालून दिलेले नियम पाळून उरल्यासुरल्या विषाणूलाही पिटाळून लावा. जबाबदार बना, गर्दी टाळा, मास्क लावा आणि युद्ध जिंका. 

ज्यावेळी सोयी नव्हत्या तेव्हा जिंकलो, तर आता का नाही? यवतमाळात ७०-८० वर्षांपूर्वी प्लेग आला होता. तेव्हा आजच्याएवढी आरोग्य यंत्रणा अद्ययावत नव्हती. तरही प्लेगच्या महामारीतून माणसे वाचली. वाचविली गेली. आता एकविसाव्या शतकात कोरोना आलेला असताना वैद्यकीय शास्त्रही पुढारलेले आहे. कोरोनावर औषध मिळाले नसले, तरी केवळ सात आठ महिन्यांतच लस शोधली गेली. काही साधनांचा तुटवडा असला, तरी रुग्ण कसा वाचवायचा, हे डाॅक्टरांना माहिती आहे. जुन्या काळात प्लेग संपवता आला, तर आता आधुनिक काळात कोरोनालाही संपवताच येईल. कोणीही अवसान गाळून बसण्याची अजिबात गरज नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या