शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

२० पाणीदार गावे होणार हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 10:24 PM

वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : लोकसहभागातून ७५ हजार रोपटी

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्याची निवड झाल्यानंतर ५० गावे त्यात सहभागी झाली. यापैकी २० गावांनी रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काशीद, करंज, कडूनिंब, पिंपळ, वड, शेवगा, सीताफळ आदी प्रकारच्या फुले, फळे तसेच सावली देणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या बियांची निवड केली. श्रमदानातून गोळा केलेला तळ्यातील गाळ, दर्जेदार माती, वाळू, शेणखत आदी मिश्रण करून त्यात रोपे लावण्यात आली. या रोपट्यांना सावली मिळावी म्हणून शेडनेटची व्यवस्था केली.गेल्या दोन महिन्यात लोही, बोरी, लाखखिंड, हातोला, खोपडी, पाथ्रड देवी, धामणगाव (देव), तोरनाळा, भुलाई, कोलवाई, भांडेगाव, हातगाव, पाळोदी, पांढुर्णा, कुºहाड, मुंढळ, हातगाव, बोधगव्हाण, माळेगाव, तपोना येथे ७५ हजार रोपटी तयार झाली. श्रमदानातून परिसरातील सलग समतल चरखाली, तळ्याच्या काठावर, शाळा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी गावकºयांनी घेतली आहे. ‘आपलं गावं’ हिरवगार करायचा संकल्प गावकºयांनी सोडला आहे.रोपांसाठी शासनाचा छदामही खर्च झाला नाहीवृक्षारोपणासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्चून रोपवाटिका तयार केली जाते. मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे आणि इतर अधिकारी व पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात पहिल्यांदाच लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यात आली. यात शासनाचा छदामही खर्च झाला नाही. यामुळे लोकसहभाग व श्रमदानातून होणारे वृक्षारोपण महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा