शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

१६० गाळ्यांच्या लिलावाला ‘स्टे’

By admin | Updated: January 16, 2016 02:43 IST

येथील नगरपरिषदेच्या १६० गाळ्याचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

‘अच्छे दिन’ : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, नगर विकास राज्यमंत्र्यांचा दिलासाम.आसिफ शेख वणीयेथील नगरपरिषदेच्या १६० गाळ्याचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे गाळेधारक संभ्रमात सापडले होते. त्यानंतर गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे १६० गाळेधारकांना ‘अच्छे दिन’ आले आहे.सध्या येथील नगरपरिषद गाळ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधी चौक व भाजी मंडीतील १६० गाळे नगरपरिषदेने खाली करून घ्यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन करून संपूर्ण गाळ्यांचा नव्याने जाहीर लिलाव करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे गाळेधारकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. नगरपरिषदेला ५७ वर्षांपूर्वी तत्कालीन मध्य प्रदेश शासनाने बाजार चौकासाठी शिट क्रमांक १९ अ व १९ ब मधील २५ हजार ५०० चौरस फूट जागा व भाजी मंडी शिट क्रमांक १९ सीमधील प्लॉट क्रमांक ८९१३ ही जागा वार्षिक मूल्यांकन लावून दिली होती. त्यावर नगरपरिषदेने गाळ्यांचा मर्यादित काळासाठी लिलाव केला होता. त्यावेळी भाडे अत्यल्प होते. सध्या तेच भाडे गाळेधारक देत असून त्यामुळे नगरपरिषदेला कोट्यवधींचा फटका बसत आहे. आता बहुसंख्य गाळ्यांचे मूळ मालक हयात नाहीत. अनेकांनी गाळे परस्पर विकले आहे. काहींनी जुन्या गाळ्यांची तोडफोड करून परवानगी न घेताच दुसरा मजला चढविला आहे. सध्या या जागेची किंमत १० हजार रूपये चौरस फूट आहे. भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी २००१ पासून भाडेच दिले नाही, अशी माहिती आहे. नगरपरिषदेचे होणारे नुकसान लक्षात घेता स्विकृत नगरसेवक पी.के. टोंगे यांनी गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्याची मागणी केली होती. तसा ठराव नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केलीच नाही. शेवटी टोंगे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आदेश करून अर्जदारास १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करावे व त्यांनी सहा आठवड्यात सदर निवेदनावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल दाखल करण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करून १६० गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले. त्यांच्या आदेशाविरूद्ध गुरूमुख केशवाणी व इतर गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अपिल केले होते. गाळेधारकांच्या अपिलाच्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्र्यांनी या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रकरणातील गाळ्यांचे मूल्यांकन नगररचना विभागाकडून करून घेऊन भाडे आकारणी करावी. तोपर्यंतच्या कालावधीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश स्थगित ठेवावा, असे पत्र पाठविले. तसेच गाळे ३० वर्षांच्या कालावधीकरिता भाडे पट्टीवर देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी विहित कार्यपद्धतीवर अवलंबून तातडीने सादर करावा, असे पत्र जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन संचालक व नगरपरिषदेला पाठविले आहे. याप्रकरणी गांधी चौकातील सुशिक्षित बेरोजगार तथा फळ विक्रेत्यांनी नगरपरिषदेकडे गाळेधारक नियमबाह्य काम करून कोट्यवधींचे नुकसान करीत असल्याची तक्रार केली होती. तसेच गाळे लिलाव केल्यास आम्ही ते घेण्यास सक्षम आहोत, असे म्हटले होते. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना गांधी चौकात अद्याप मोठ्या प्रमाणात दुमजली बांधकाम सुरूच आहे.