शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप वीज जोडणीसाठी १५२ कोटी

By admin | Updated: May 7, 2017 00:54 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाभूळगाव येथे सखोल आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : बाभूळगावात आढावा बैठक, सिंचन, दुग्धव्यवसाय, गटशेतीबाबत निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क बाभूळगाव : यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाभूळगाव येथे सखोल आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीककर्ज पुरवठा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांचा आढावा घेत कृषी पंप वीज जोडणीसाठी १५२ कोटी रूपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा या बैठकीत केली. बैठकीच्या सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामाची बि-बियाणे वाटप आणि पीककर्जाच्या नियोजनाची माहिती घेतली. शेतकऱ्यांना ९० टक्के खरिपाचे कर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यासाठी बँकांनी कर्ज मेळावे घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे जिल्ह्याच्या उत्पन्नात ४५० कोटींची भर पडल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे जलयुक्त शिवारची संपूर्ण कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे यंत्रणेला सांगितले. जिल्ह्यात कृषी पंप वीज जोडणीचे ५ हजार ४३० प्रस्ताव प्रलंबित आहे. ही प्रलंबित प्रकरणे तत्काळ पूर्ण करून १५ दिवसांच्या आत मागेल त्याला वीज जोडणी देण्यासाठी १५२ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला जोडधंदा म्हणून दुध व पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रकल्पामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी २० शेतकऱ्यांचा १०० एकर जमीन असलेला गट तयार केल्यास ५० लाख रुपयांपर्यंतच्या सर्व योजना एकत्रित राबविण्यात येईल. याबाबत सिंचन क्षमता वाढविण्याचे धोरण शासन राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वाटपाचे नियोजन होणार असून जिल्ह्यातील सिंचनासंदर्भात प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांना ७ दिवसात शासन मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रखडलेल्या प्रकल्पाचे काम ‘मिशन मोड’मध्ये करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण व शहरी भागात राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजनेचीही माहिती त्यांनी घेतली. या शिवाय बैठकीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तालुुकानिहाय आढावा घेण्यात आला. ज्या तालुक्यात कामाची गती कमी आहे, अशा महसूल, कृषी व गटविकास अधिकाऱ्यांकडून कामांच्या पद्धतीसंदर्भात माहिती घेत त्यांना काम पूर्ण करण्याची तंबी दिली. या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला उपस्थित होते. तसेच या दौऱ्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, बाभूळगावातील स्थानिक नेते अमन गावंडे, प्रभाकर वाघमारे, गुणवंत ठाकरे, सचिन महल्ले, जिल्हा परिषदेच्या सभापती प्रज्ञा भूमकाळे, प्रकाश भूमकाळे, मनोहर बुरेवार, कोमल खंते, गौतम लांडगे, पवन मानलवार, विवेक परडखे आदींनी पुढाकार घेतला होता. दोन वर्षात ५० हजार हेक्टरचे अतिरिक्त सिंचन जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाटसऱ्याचे काम प्राधान्याने पूर्ण करून दोन वर्षांत ५० हजार हेक्टरवर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानामुळे ४ हजार ८७२ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला असून त्यातून ४ हजार १९३ हेक्टरवर शाश्वत सिंचनाची सोय झाल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत दिली. दोन तालुके प्रगत झाल्याचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ५६५ शाळांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. उर्वरित शाळाही प्रगत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्यातील कुपोषणातही घट झाल्याची माहिती मख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.