शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

१४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:56 IST

वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचे हल्ले : यवतमाळ वनवृत्तात वाघ, रानडुकरांची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे. पेरणी करताच शेतात मुक्कामाला जावे लागत आहे.वनवृत्तात येणाऱ्या यवतमाळ, पांढरकवडा, पुसद या तीन वनविभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. पांढरकवडा उपविभागात नरभक्षक वाघिणीने आत्तापर्यंत १४ बळी घेतले. यवतमाळ उपविभागात रानडुक्कर आणि अस्वलाची दशहत आहे. यवतमाळ वनविभागात २८ जण जखमी झाले, तर पुसदमध्ये २९, पांढरकवडात ३१, अकोला-वाशिम वनविभागात ३६ जण जखमी झाले. पाचही वनविभागात ३३४ पाळीव पशू ज्यात गाय, म्हैस, बैल, बकरी यांचा फडशा पाडला आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी अनेक शेताकडे फिरकण्याची सोय उरलेली नाही. वन विभाग नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी मदत देते. जखमींना तर या मदतीतून पुरेपूर उपचारही घेता येत नाही. आत्तापर्यंत मदतीपोटी जखमींना ६७ लाख २७ हजार दिले गेले. पशुधन हानीत ३४ लाख ५६ हजार, पीक नुकसानीच्या मोबदल्यात पाच कोटी २२ लाखांची मदत दिली गेली. जीवितहानी हानी झाल्यास प्रत्येकी आठ लाख रुपये कुटुंबीयांना दिले.शेतकºयांना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना स्वत:चा बळी द्यावा लागत आहे. रानडुकरांचे भरदिवसा हल्ले होत आहेत. यावर वनविभागाने तातडीने पर्याय शोधण्याची गरज आहे.पीक पॅटर्न बदलल्याने पशुसंगोपनाचा प्रश्नरानडुकरांच्या त्रासामुळे खरिपातील ज्वारीची पेरणीच निम्म्यावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ २५ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, मूग नऊ हजार ३५४ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. बाजारभाव चांगला व अधिक नफा देणारे हे पीक नाईलाजाने शेतकऱ्यांना सोडावे लागले आहे. ज्वारीसारखे चारा पीकच घेता येत नसल्याने, भविष्यात भीषण चारा टंचाई निर्माण होते. याला कंटाळून शेतकऱ्यांनी पशुधन कमी केले आहे. एकीकडे शासन दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांमुळे चारा पीक नसल्याने पशु संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही समस्यांची गुंतागुंत सोडविण्यासाठी ठोस धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी