शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

१४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:56 IST

वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचे हल्ले : यवतमाळ वनवृत्तात वाघ, रानडुकरांची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे. पेरणी करताच शेतात मुक्कामाला जावे लागत आहे.वनवृत्तात येणाऱ्या यवतमाळ, पांढरकवडा, पुसद या तीन वनविभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. पांढरकवडा उपविभागात नरभक्षक वाघिणीने आत्तापर्यंत १४ बळी घेतले. यवतमाळ उपविभागात रानडुक्कर आणि अस्वलाची दशहत आहे. यवतमाळ वनविभागात २८ जण जखमी झाले, तर पुसदमध्ये २९, पांढरकवडात ३१, अकोला-वाशिम वनविभागात ३६ जण जखमी झाले. पाचही वनविभागात ३३४ पाळीव पशू ज्यात गाय, म्हैस, बैल, बकरी यांचा फडशा पाडला आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी अनेक शेताकडे फिरकण्याची सोय उरलेली नाही. वन विभाग नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी मदत देते. जखमींना तर या मदतीतून पुरेपूर उपचारही घेता येत नाही. आत्तापर्यंत मदतीपोटी जखमींना ६७ लाख २७ हजार दिले गेले. पशुधन हानीत ३४ लाख ५६ हजार, पीक नुकसानीच्या मोबदल्यात पाच कोटी २२ लाखांची मदत दिली गेली. जीवितहानी हानी झाल्यास प्रत्येकी आठ लाख रुपये कुटुंबीयांना दिले.शेतकºयांना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना स्वत:चा बळी द्यावा लागत आहे. रानडुकरांचे भरदिवसा हल्ले होत आहेत. यावर वनविभागाने तातडीने पर्याय शोधण्याची गरज आहे.पीक पॅटर्न बदलल्याने पशुसंगोपनाचा प्रश्नरानडुकरांच्या त्रासामुळे खरिपातील ज्वारीची पेरणीच निम्म्यावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ २५ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, मूग नऊ हजार ३५४ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. बाजारभाव चांगला व अधिक नफा देणारे हे पीक नाईलाजाने शेतकऱ्यांना सोडावे लागले आहे. ज्वारीसारखे चारा पीकच घेता येत नसल्याने, भविष्यात भीषण चारा टंचाई निर्माण होते. याला कंटाळून शेतकऱ्यांनी पशुधन कमी केले आहे. एकीकडे शासन दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांमुळे चारा पीक नसल्याने पशु संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही समस्यांची गुंतागुंत सोडविण्यासाठी ठोस धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी