शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

१४ शेतकरी शिकार, १७२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:56 IST

वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचे हल्ले : यवतमाळ वनवृत्तात वाघ, रानडुकरांची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. रानडुकरांच्या दहशतीमुळे ज्वारी, मूग, उडीदाचे खरिपातील क्षेत्र घटले आहे. पेरणी करताच शेतात मुक्कामाला जावे लागत आहे.वनवृत्तात येणाऱ्या यवतमाळ, पांढरकवडा, पुसद या तीन वनविभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. पांढरकवडा उपविभागात नरभक्षक वाघिणीने आत्तापर्यंत १४ बळी घेतले. यवतमाळ उपविभागात रानडुक्कर आणि अस्वलाची दशहत आहे. यवतमाळ वनविभागात २८ जण जखमी झाले, तर पुसदमध्ये २९, पांढरकवडात ३१, अकोला-वाशिम वनविभागात ३६ जण जखमी झाले. पाचही वनविभागात ३३४ पाळीव पशू ज्यात गाय, म्हैस, बैल, बकरी यांचा फडशा पाडला आहे. वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी अनेक शेताकडे फिरकण्याची सोय उरलेली नाही. वन विभाग नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी मदत देते. जखमींना तर या मदतीतून पुरेपूर उपचारही घेता येत नाही. आत्तापर्यंत मदतीपोटी जखमींना ६७ लाख २७ हजार दिले गेले. पशुधन हानीत ३४ लाख ५६ हजार, पीक नुकसानीच्या मोबदल्यात पाच कोटी २२ लाखांची मदत दिली गेली. जीवितहानी हानी झाल्यास प्रत्येकी आठ लाख रुपये कुटुंबीयांना दिले.शेतकºयांना वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना स्वत:चा बळी द्यावा लागत आहे. रानडुकरांचे भरदिवसा हल्ले होत आहेत. यावर वनविभागाने तातडीने पर्याय शोधण्याची गरज आहे.पीक पॅटर्न बदलल्याने पशुसंगोपनाचा प्रश्नरानडुकरांच्या त्रासामुळे खरिपातील ज्वारीची पेरणीच निम्म्यावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात केवळ २५ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, मूग नऊ हजार ३५४ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. बाजारभाव चांगला व अधिक नफा देणारे हे पीक नाईलाजाने शेतकऱ्यांना सोडावे लागले आहे. ज्वारीसारखे चारा पीकच घेता येत नसल्याने, भविष्यात भीषण चारा टंचाई निर्माण होते. याला कंटाळून शेतकऱ्यांनी पशुधन कमी केले आहे. एकीकडे शासन दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांमुळे चारा पीक नसल्याने पशु संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ही समस्यांची गुंतागुंत सोडविण्यासाठी ठोस धोरण आखण्याची नितांत आवश्यकता आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी