शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

१११ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:41 IST

वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देप्रतीक्षा पावसाची : दारव्हा तालुक्यात ‘तूफान आलया’, ५५ गावांमध्ये वाटर कप स्पर्धा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्याची पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर गेल्या १८ नोव्हेंबरपासून श्रमदानाला सुरुवात झाली. २२ मे रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. त्यानिमित्त समारोपीय श्रमदानाचा कार्यक्रम मुंढळ येथे रविवारी झाला. सध्या गावांतील कामांचे मूल्यांकन सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांना पाण्याच्या बाबतीत समृद्ध करण्याची संधी चालून आली. काही गावांनी प्रचंड मेहनतीने या संधीचे सोने केले. यात विविध संघटना व अधिकाऱ्यांची साथ लाभली. २७ नोव्हेंबरपासून उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी या कार्याचा विडा उचलला. त्यांनी गावागावात ग्रामसभा घेऊन फायदे पटवून सांगितले. नंतर २० व २१ डिसेंबरला दोन दिवसीय स्पर्धा प्रदर्शन झाले.तालुक्यातील ५५ गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. नंतर नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. चार महिन्यात तब्बल १५० सभा घेण्यात आल्या. यातून शोषखड्ड्यांची निर्मिती, माती परीक्षण, रोपवाटिका आदी कामांना गती आली. ७ एप्रिलला मध्यरात्रीपासून २० गावांमध्ये श्रमदान सुरू झाले.नागरिक एकदिलाने कामाला लागले. श्रमदानात मॉर्निंग वॉक ग्रुप, चैतन्य ग्रुप, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, पत्रकार संघटना, सोनार संघटना, ज्येष्ठ नागरिक, साई समिती, गणपती मंदिर ग्रुप, युवक, महिला आदींचे सहकार्य लाभले. तालुक्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.महसूल प्रशासनासह विविध संघटनांचा मोठा वाटाया श्रमदान चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली ती महसूल प्रशासनाने. त्यांना सहकार्य करण्याचे काम इतर शासकीय कार्यालयांनी केले. यात एसडीओ जयंत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे, तहसीलदार अरुण शेलार, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता संदीप गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, बीडीओ बी.एच. पाचपाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे, कृषी अधिकारी नालंदा भरणे, ठाणेदार रिता उईके, पालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी या कार्यात सहभागी झाले.केवळ चारच गावांमध्ये तांत्रिक मूल्यमापनया स्पर्धेत ५५ गावे सहभागी झाली. त्यापैकी खोपडी बु., मुंढळ, तपोना, बोधगव्हाण, लोही, हातोला, तोरनाळा, लाखखिंड, हातगाव, पाथ्रडदेवी, करजगाव, रामगाव (रामेश्वर), भांडेगाव, तेलगव्हाण, कोलवाई, कुºहाड, गोरेगाव, पाळोदी, भुलाई, गौळपेंड, माळेगाव आदी २२ गावात मोठ्या प्रमाणात कामे झाली. मात्र तांत्रिकदृष्ट्या चारच गावात कामे झाल्याचे मूल्यांकनानंतर स्पष्ट झाले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा