शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

१११ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:41 IST

वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देप्रतीक्षा पावसाची : दारव्हा तालुक्यात ‘तूफान आलया’, ५५ गावांमध्ये वाटर कप स्पर्धा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेत तब्बल पाच महिने घाम गाळून गावकरी व विविध संघटनांनी ११ लाख १३ हजार ८४३ घनमीटर काम केले. यातून तब्बल १११ कोटी ३८ लाख ३४ हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे.तालुक्याची पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर गेल्या १८ नोव्हेंबरपासून श्रमदानाला सुरुवात झाली. २२ मे रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. त्यानिमित्त समारोपीय श्रमदानाचा कार्यक्रम मुंढळ येथे रविवारी झाला. सध्या गावांतील कामांचे मूल्यांकन सुरू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांना पाण्याच्या बाबतीत समृद्ध करण्याची संधी चालून आली. काही गावांनी प्रचंड मेहनतीने या संधीचे सोने केले. यात विविध संघटना व अधिकाऱ्यांची साथ लाभली. २७ नोव्हेंबरपासून उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी या कार्याचा विडा उचलला. त्यांनी गावागावात ग्रामसभा घेऊन फायदे पटवून सांगितले. नंतर २० व २१ डिसेंबरला दोन दिवसीय स्पर्धा प्रदर्शन झाले.तालुक्यातील ५५ गावांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. नंतर नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. चार महिन्यात तब्बल १५० सभा घेण्यात आल्या. यातून शोषखड्ड्यांची निर्मिती, माती परीक्षण, रोपवाटिका आदी कामांना गती आली. ७ एप्रिलला मध्यरात्रीपासून २० गावांमध्ये श्रमदान सुरू झाले.नागरिक एकदिलाने कामाला लागले. श्रमदानात मॉर्निंग वॉक ग्रुप, चैतन्य ग्रुप, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, व्यापारी संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघ, पत्रकार संघटना, सोनार संघटना, ज्येष्ठ नागरिक, साई समिती, गणपती मंदिर ग्रुप, युवक, महिला आदींचे सहकार्य लाभले. तालुक्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.महसूल प्रशासनासह विविध संघटनांचा मोठा वाटाया श्रमदान चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली ती महसूल प्रशासनाने. त्यांना सहकार्य करण्याचे काम इतर शासकीय कार्यालयांनी केले. यात एसडीओ जयंत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे, तहसीलदार अरुण शेलार, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता संदीप गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, बीडीओ बी.एच. पाचपाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे, कृषी अधिकारी नालंदा भरणे, ठाणेदार रिता उईके, पालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी या कार्यात सहभागी झाले.केवळ चारच गावांमध्ये तांत्रिक मूल्यमापनया स्पर्धेत ५५ गावे सहभागी झाली. त्यापैकी खोपडी बु., मुंढळ, तपोना, बोधगव्हाण, लोही, हातोला, तोरनाळा, लाखखिंड, हातगाव, पाथ्रडदेवी, करजगाव, रामगाव (रामेश्वर), भांडेगाव, तेलगव्हाण, कोलवाई, कुºहाड, गोरेगाव, पाळोदी, भुलाई, गौळपेंड, माळेगाव आदी २२ गावात मोठ्या प्रमाणात कामे झाली. मात्र तांत्रिकदृष्ट्या चारच गावात कामे झाल्याचे मूल्यांकनानंतर स्पष्ट झाले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा