अहमदनगर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 'कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे सत्तेत आले, त्यांनाच विसरले'; अशी चपराक राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावली आहे.