शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

७३ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षातच ‘झेडपी’च्या अधिकारांवर टाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:39 PM

राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशातील पंचायत राज संस्थांना अधिक अधिकार मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरूस्ती केली. राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण करीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना अधिकार बहाल करणाºया ७३ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षातच राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.ग्रामविकास विभागाने अलिकडच्या काळात पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था तथा मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर टाच आणली आहे. पंचायत राज संस्थांना बळकटी देण्यासाठी, राज्यातील अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाने १९९३ मध्ये ७३ वी घटनादुरूस्ती केली. त्यानुसार राज्यातील विविध २९ विषयांचे अधिकार जिल्हा परिषदांना मिळणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४ विषय जिल्हा परिषदेकडे सोपविले आहेत. अलिकडच्या काळात या अधिकारातही कपात केली तर काही अधिकार राज्य सरकार परत घेत असल्याचे दिसून येते. यंदा ७३ व्या घटनादुरूस्तीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात घटनादुरूस्तीनुसार सर्व अधिकार मिळतील, या आशेवर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाºयांना अधिकार कपातीला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग निर्मिती करण्याचा अधिकार आता पालकमंत्र्यांच्या समितीला देण्यात आला आहे. पदभरती राज्य शासन करणार, शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून होत आहेत. कृषी विभाग तर सेस फंडापुरताच मर्यादीत ठेवला आहे. विशेष घटक योजना बाद करण्यात आली. कृषी सेवा केंद्र परवाना, बियाणे विक्री परवाना, किटकनाशक विक्री परवाना, कृषी अभियांत्रिकीकरण योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे यापूर्वीच देण्यात आल्या तर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत बळकटीकरण योजनाही हस्तांतरीत झाली आहे. निधी कपातही केली जात असल्याने ‘झेडपी’च्या पदाधिकाºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी लवकरच दाद मागणार आहेत, अशी माहिती जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद