शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:49 IST

Police recruitment पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.

ठळक मुद्देजिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेतीत्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:    राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात ४  जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर  रद्द करण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याने पाेलीस भरतीची तयारी करण्यात येत असलेल्या तरुणांचा पूर्ण हिरमाेड झाला आहे. अनेक वर्षांपासून करीत असलेली मेहनत व्यर्थ ठरते की काय अशी भीती तरुणांमध्ये असल्याचे ‘लाेकमत’ने ९ जानेवारी राेजी त्यांच्याशी संपर्क साधला असता दिसून आले. जिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेती. त्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही. यामध्ये जिल्ह्यातील अनेक तरुण सहभागी झाले हाेते.  तेव्हा काही कारणास्तव रद्द ठरलेले तरुण रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यात भरतीचा जीआर निघाल्याने त्यांच्यामध्ये आनंद दिसून येत हाेता; परंतु ४ जानेवारीला ताे जीआर रद्द करण्यात आल्याने पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.

जिल्ह्यात ६८० लोकांमागे एक पोलीसजिल्ह्यात पोलिसांची संख्या केवळ १,५०० आहे. जिल्ह्याची २०११ नुसार लाेकसंख्या १० लाख २६ हजार पाहता ६८० लाेकांमागे एक पाेलीस कर्मचारी दिसून येताे. यामुळे पाेलिसांवर किती माेठा ताण आहे हे दिसून येते. नागरिकांचे संरक्षणासह जिल्ह्यातील अनेक प्रकाराला आळा घालताना पाेलिसांची दमछाक हाेत आहे.

काय म्हणतात तरुण!२०१७-१८ पासून पाेलीस भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी पाेलीस भरतीबाबत जीआर काढण्यात आला हाेता; परंतु ताेही रद्द करण्यात आल्याने पाेलीस हाेण्याची आशा धूसर झाली आहे. तब्बल तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. गत भरतीमध्ये केवळ तीन गुण कमी पडल्या ने भरती हाेऊ शकलाे नाही. यावर विचार हाेणे गरजेचे आहे.- रवी माेहळे, जांभरुण परांडे

 मी गत तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. त्यात वय वाढत आहे. लवकच भरती प्रक्रिया न झाल्यास पाेलीस हाेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. गत भरतीमध्ये ग्राउंडमध्ये कमी पडलाे हाेताे. यावेळी मेहनत घेतली; परंतु पाेलीस भरती हाेईल की नाही, ही चिंता आहे. - संताेष कैलास गायकवाडजांभरुण परांडे

पाेलीस भरतीसाठी काढण्यात आलेला जीआर रद्द झाल्याने पाेलीस हाेण्याच्या आशा मावळल्या. अनेक वर्षांपासून मोठी भरती झाली नाही. ५ ते ६ हजार भरती हाेते. त्यातही नव्यानेच रद्द केलेल्या जीआरमुळे उमेदवार नाराज झाले आहेत. माझे कुटुंब शेतीवर अवलंबून असून घरच्यांची पाेलीस व्हायची इच्छा आहे; परंतु वय वाढत असल्याने पाेलीस भरती लवकर झाली तरच खरे. - ओंकार वानखडे , वाळकी मांजरी

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस