शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:49 IST

Police recruitment पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.

ठळक मुद्देजिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेतीत्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:    राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात ४  जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर  रद्द करण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याने पाेलीस भरतीची तयारी करण्यात येत असलेल्या तरुणांचा पूर्ण हिरमाेड झाला आहे. अनेक वर्षांपासून करीत असलेली मेहनत व्यर्थ ठरते की काय अशी भीती तरुणांमध्ये असल्याचे ‘लाेकमत’ने ९ जानेवारी राेजी त्यांच्याशी संपर्क साधला असता दिसून आले. जिल्ह्यात २०१६, २०१७-१८ मध्ये पाेलीस भरती घेण्यात आली हाेती. त्यांनतर जिल्ह्यात पाेलीस भरतीच घेण्यात आली नाही. यामध्ये जिल्ह्यातील अनेक तरुण सहभागी झाले हाेते.  तेव्हा काही कारणास्तव रद्द ठरलेले तरुण रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यात भरतीचा जीआर निघाल्याने त्यांच्यामध्ये आनंद दिसून येत हाेता; परंतु ४ जानेवारीला ताे जीआर रद्द करण्यात आल्याने पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.

जिल्ह्यात ६८० लोकांमागे एक पोलीसजिल्ह्यात पोलिसांची संख्या केवळ १,५०० आहे. जिल्ह्याची २०११ नुसार लाेकसंख्या १० लाख २६ हजार पाहता ६८० लाेकांमागे एक पाेलीस कर्मचारी दिसून येताे. यामुळे पाेलिसांवर किती माेठा ताण आहे हे दिसून येते. नागरिकांचे संरक्षणासह जिल्ह्यातील अनेक प्रकाराला आळा घालताना पाेलिसांची दमछाक हाेत आहे.

काय म्हणतात तरुण!२०१७-१८ पासून पाेलीस भरती झाली नाही. काही दिवसांपूर्वी पाेलीस भरतीबाबत जीआर काढण्यात आला हाेता; परंतु ताेही रद्द करण्यात आल्याने पाेलीस हाेण्याची आशा धूसर झाली आहे. तब्बल तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. गत भरतीमध्ये केवळ तीन गुण कमी पडल्या ने भरती हाेऊ शकलाे नाही. यावर विचार हाेणे गरजेचे आहे.- रवी माेहळे, जांभरुण परांडे

 मी गत तीन वर्षांपासून पाेलीस भरतीसाठी मेहनत घेत आहे. त्यात वय वाढत आहे. लवकच भरती प्रक्रिया न झाल्यास पाेलीस हाेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. गत भरतीमध्ये ग्राउंडमध्ये कमी पडलाे हाेताे. यावेळी मेहनत घेतली; परंतु पाेलीस भरती हाेईल की नाही, ही चिंता आहे. - संताेष कैलास गायकवाडजांभरुण परांडे

पाेलीस भरतीसाठी काढण्यात आलेला जीआर रद्द झाल्याने पाेलीस हाेण्याच्या आशा मावळल्या. अनेक वर्षांपासून मोठी भरती झाली नाही. ५ ते ६ हजार भरती हाेते. त्यातही नव्यानेच रद्द केलेल्या जीआरमुळे उमेदवार नाराज झाले आहेत. माझे कुटुंब शेतीवर अवलंबून असून घरच्यांची पाेलीस व्हायची इच्छा आहे; परंतु वय वाढत असल्याने पाेलीस भरती लवकर झाली तरच खरे. - ओंकार वानखडे , वाळकी मांजरी

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस