शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर टेंडर ओपन करण्यासाठी जवळपास दोन महिने लागले. आता ...

या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर टेंडर ओपन करण्यासाठी जवळपास दोन महिने लागले. आता टेंडर ओपन झाल्यानंतरही कामाला सुरुवात न झाल्यामुळे व्यापारी वर्गात, नागरिकांत असंतोष खदखदत आहे. हा रस्ता शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असून, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्या कार्यशैलीवर व प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे. या रस्त्यावर पावसाळा सुरू झाला की अक्षरशः पाण्याची डबके साचून चालणे किंवा गाडी चालविणे फार कठीण होते. पाणी साचले तरी, मुरूम टाकण्याचे कामही बांधकाम विभागाकडून केले जात नसल्याची मोठी खंत शहरवासीयांना आहे. कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्याचे काम झाले पाहिजे, याविषयी आग्रही भूमिका घ्यायला तयार नाही. शहराच्या मध्यभागी रस्ता असला, तरी तो नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासन कामाच्यासंदर्भात अंतर ठेवून आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात रस्ता येत असला, तरी त्यांच्याकडे निधीच उपलब्ध होत नाही. काही महिन्यांपूर्वी युवा समाजसेवक अनंत देशमुख यांनी उपोषण केले होते आणि नागरिकांचा त्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. परंतु तालुक्यातील जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरू करण्याच्या लेखी पत्रानुसार उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. जबाबदार अधिकारी लेखी पत्र देत असल्यामुळे काम सुरू होण्याची शास्वती नागरिकांना वाटत होती; परंतु अनेक महिने लोटले तरी अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही राजकीय नेत्याप्रमाणे फसवे निघाल्याने सर्व शहरवासीयांचा भ्रमनिरास झाला. यासंदर्भात संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, टेंडरही ओपन केल्याचे समजते, मात्र ही सर्व प्रक्रिया गुलदस्त्यात ठेवून सुरू असल्यामुळे सर्वसामान्य व्यापारी, नागरिकांना यासंदर्भात काहीच माहिती मिळत नाही. जर टेंडर ओपन झाले, तर कामास सुरुवात का नाही, असाही प्रश्न या व्यापाऱ्यांना व नागरिकांना पडला आहे. आता पावसाळा येतोय, तरीही काम सुरू होत नाही, हे पाहून बांधकाम विभागाच्या ढिसाळ आणि कर्तव्यशून्य व्यवस्थापनाविषयी प्रचंड चीड सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.