शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

...तरीही रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर टेंडर ओपन करण्यासाठी जवळपास दोन महिने लागले. आता ...

या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाल्यानंतर त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर टेंडर ओपन करण्यासाठी जवळपास दोन महिने लागले. आता टेंडर ओपन झाल्यानंतरही कामाला सुरुवात न झाल्यामुळे व्यापारी वर्गात, नागरिकांत असंतोष खदखदत आहे. हा रस्ता शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असून, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्या कार्यशैलीवर व प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे. या रस्त्यावर पावसाळा सुरू झाला की अक्षरशः पाण्याची डबके साचून चालणे किंवा गाडी चालविणे फार कठीण होते. पाणी साचले तरी, मुरूम टाकण्याचे कामही बांधकाम विभागाकडून केले जात नसल्याची मोठी खंत शहरवासीयांना आहे. कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्याचे काम झाले पाहिजे, याविषयी आग्रही भूमिका घ्यायला तयार नाही. शहराच्या मध्यभागी रस्ता असला, तरी तो नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे स्थानिक नगर परिषद प्रशासन कामाच्यासंदर्भात अंतर ठेवून आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात रस्ता येत असला, तरी त्यांच्याकडे निधीच उपलब्ध होत नाही. काही महिन्यांपूर्वी युवा समाजसेवक अनंत देशमुख यांनी उपोषण केले होते आणि नागरिकांचा त्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. परंतु तालुक्यातील जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरू करण्याच्या लेखी पत्रानुसार उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. जबाबदार अधिकारी लेखी पत्र देत असल्यामुळे काम सुरू होण्याची शास्वती नागरिकांना वाटत होती; परंतु अनेक महिने लोटले तरी अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही राजकीय नेत्याप्रमाणे फसवे निघाल्याने सर्व शहरवासीयांचा भ्रमनिरास झाला. यासंदर्भात संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, टेंडरही ओपन केल्याचे समजते, मात्र ही सर्व प्रक्रिया गुलदस्त्यात ठेवून सुरू असल्यामुळे सर्वसामान्य व्यापारी, नागरिकांना यासंदर्भात काहीच माहिती मिळत नाही. जर टेंडर ओपन झाले, तर कामास सुरुवात का नाही, असाही प्रश्न या व्यापाऱ्यांना व नागरिकांना पडला आहे. आता पावसाळा येतोय, तरीही काम सुरू होत नाही, हे पाहून बांधकाम विभागाच्या ढिसाळ आणि कर्तव्यशून्य व्यवस्थापनाविषयी प्रचंड चीड सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.