शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

यंदा प्रथमच कोरडी पडली तपोवनची ‘बारव’!

By admin | Published: May 20, 2017 1:42 AM

भाविकांमध्ये कुतूहल : जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता घटल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पौराणिक महत्त्व प्राप्त असलेल्या जिल्ह्यातील तपोवन (ता.मालेगाव) येथील ‘बारव’ यापूर्वी कधीच कोरडी पडली नाही. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात ही ‘बारव’ आणि त्याला लागून असलेल्या विहिरीत थेंबभरही पाणी शिल्लक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रामायण कालखंडात सीतेने तपोवनच्या ‘बारव’जवळ थांबून आंघोळ केली होती, अशी आख्यायिका असलेल्या मालेगाव तालुक्यातील तपोवनमध्ये महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे दर महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात महिनाभर भाविकांची दर्शनासाठी अक्षरश: रीघ लागते. मंदिराला लागूनच पाण्याची मोठी ‘बारव’ आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळत असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मात्र, यावर्षीच्या उन्हाळ्यात सदर ‘बारव’मधील पाणी पूर्णत: आटले आहे. ही घटना यापूर्वी कधीच अनुभवली नाही, असे परिसरातील वयोवृद्ध मंडळी सांगतात. तथापि, पावसाळ्यात जमिनीवर कोसळणारे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जमिनीखालची पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळेच ही स्थिती उद्भवल्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी वर्तविला आहे.