शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कंत्राटी  कर्मचाऱ्यांचे ‘मी १५ वर्षांपासूनचा दुर्लक्षित कर्मचारी’ची फीत लावून कामकाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:11 IST

१९ मे पासून ‘मी १५ वर्षांपासूनचा दुर्लक्षित कर्मचारी’ची फीत लावून कंत्राटी कर्मचारी कामकाज करित असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गत १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी असताना शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले. त्यामुळे संतापलेल्या कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला असून १८ मे रोजी काळी फित लावून; तर १९ मे पासून ‘मी १५ वर्षांपासूनचा दुर्लक्षित कर्मचारी’ची फीत लावून कंत्राटी कर्मचारी कामकाज करित असल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भातील निवेदनात नमूद आहे, की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मागील १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी इमानेइतबारे सेवा दिली. कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली. त्यातही प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्यात येत आहे. दरम्यान, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे समकक्ष पदांवर बिनशर्त समायोजन करावे, अशी मागणी होत असताना शासनाने आतापर्यंत आश्वासनांशिवाय काहीच केले नाही. त्यातच आता १७०० कायमस्वरुपी पदे भरण्याची तयारी चालविल्याने कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभरासह वाशिम जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात्मक मार्ग स्विकारला असून १९ ते २५ मे या कालावधीत ‘मी १५ वर्षांचा दुर्लक्षित कंत्राटी कर्मचारी, माझ्या अनुभवाचा, सेवेचा व शिक्षणाचा विचार करा’, असे नमूद असलेली फित लावून कामकाम करणे, २६ मे रोजी एकदिवसीय लाक्षणिक बंद, त्यानंतर आॅनलाईन व आॅफलाईन रिपोर्टींग बंद करणे, २८ मे पासून कोव्हीड रुग्णसेवा वगळता इतर सर्व कामे बंद व कामावर असताना बेमुदत उपोषण करण्यासह पुढेही आंदोलने केली जाणार आहेत, असे कळविण्यता आले.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीagitationआंदोलन