शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यावर विमा भरपाई देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम जिल्ह्यात जुलै २०२१ च्या मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक ...

दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम जिल्ह्यात जुलै २०२१ च्या मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यापैकी ९०१४ शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत विमा भरपाईसाठी अर्ज केले. तथापि, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण विलंबाने पूर्ण केले. दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यावर विमा भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

वाशिम जिल्ह्यात ३० जुलै २०२१ च्या अहवालानुसार २ लाख २९ हजार ५९२ शेतकऱ्यांनी १ लाख ७७ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रातील पिकांना विमा कवच दिले. यासाठी त्यांनी ७५७ कोटी ८८ लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला. जुलैच्या मध्यंतरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांसह जमीन खरडून गेली. यात पीक विमाधारक शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यापैकी ९ हजार १४ शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या भरपाईसाठी निर्धारित मुदतीत अर्ज केले. तथापि, सर्वेक्षणाला विलंब लागल्याने प्रत्यक्ष अहवाल तयार होऊन शासनाकडून मदत मंजूर होण्यास अधिकच वेळ लागणार आहे. त्यामुळेच शेतकरी हताश झाले असून, रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यानंतर विमा भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

०००००००००

पीक विमा काढलेले एकूण शेतकरी - २,४२,८०४

विमा कवच दिलेले क्षेत्र (हेक्टर)- १, ८७,७५८

जुलैमध्ये नुकसान झालेले शेतकरी- ९०१४,

०००००००००००००००००००००००००००

दावा करणारे तालुकानिहाय शेतकरी (जुलै २०२१)

तालुका - शेतकरी

मंगरुळपीर - ४७८३

मानोरा - २८८७

वाशिम - १०७५

रिसोड - १३३

कारंजा - ८६

मालेगाव - ५०

००००००००००००००००००००००००

ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही ३२४५ शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्ह्यात जुलैमधील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ९०१४ शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मंजूर झालाच नसताना ऑगस्टच्या अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे आणखी ३२४५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी २१४२ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ११०३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण बाकी आहे.

००००००००००००००