शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यावर विमा भरपाई देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम जिल्ह्यात जुलै २०२१ च्या मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक ...

दादाराव गायकवाड - लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम जिल्ह्यात जुलै २०२१ च्या मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात पीकविमाधारक शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यापैकी ९०१४ शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत विमा भरपाईसाठी अर्ज केले. तथापि, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण विलंबाने पूर्ण केले. दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यावर विमा भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

वाशिम जिल्ह्यात ३० जुलै २०२१ च्या अहवालानुसार २ लाख २९ हजार ५९२ शेतकऱ्यांनी १ लाख ७७ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रातील पिकांना विमा कवच दिले. यासाठी त्यांनी ७५७ कोटी ८८ लाख रुपयांचा विमा हप्ताही भरला. जुलैच्या मध्यंतरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांसह जमीन खरडून गेली. यात पीक विमाधारक शेतकऱ्यांचाही समावेश होता. त्यापैकी ९ हजार १४ शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या भरपाईसाठी निर्धारित मुदतीत अर्ज केले. तथापि, सर्वेक्षणाला विलंब लागल्याने प्रत्यक्ष अहवाल तयार होऊन शासनाकडून मदत मंजूर होण्यास अधिकच वेळ लागणार आहे. त्यामुळेच शेतकरी हताश झाले असून, रब्बी हंगामाची उलंगवाडी झाल्यानंतर विमा भरपाई देणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

०००००००००

पीक विमा काढलेले एकूण शेतकरी - २,४२,८०४

विमा कवच दिलेले क्षेत्र (हेक्टर)- १, ८७,७५८

जुलैमध्ये नुकसान झालेले शेतकरी- ९०१४,

०००००००००००००००००००००००००००

दावा करणारे तालुकानिहाय शेतकरी (जुलै २०२१)

तालुका - शेतकरी

मंगरुळपीर - ४७८३

मानोरा - २८८७

वाशिम - १०७५

रिसोड - १३३

कारंजा - ८६

मालेगाव - ५०

००००००००००००००००००००००००

ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही ३२४५ शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्ह्यात जुलैमधील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ९०१४ शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मंजूर झालाच नसताना ऑगस्टच्या अखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे आणखी ३२४५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी २१४२ शेतकऱ्यांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ११०३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण बाकी आहे.

००००००००००००००