शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी चिंतातूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:11 IST

Washim Agriculture News वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी १३ जानेवारी रोजी वनविभागाकडे केली.

वाशिम : खरीप हंगामात निसर्गाने दगा दिल्यानंतर रब्बी हंगामात अपेक्षीत उत्पादन घेण्याच्या तयारीत असलेल्या शेतकºयांसमोर वन्यप्राणी आणि विविध प्रकारच्या किडीने नवे संकट उभे केले आहे. हरभरा पिकात हैदोस घालून नुकसान करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी १३ जानेवारी रोजी वनविभागाकडे केली.२०२० वर्षे शेतकºयांसाठी फारसे लाभदायक ठरले नाही. जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसामुळे पेरण्या लवकर उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आणि काही ठिकाणी संततधार पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने मूग, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान केले. आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकºयांना सोयाबीनचा एकरी उतार दोन ते चार क्विंटलदरम्यान झाला. सोयाबीनला एकरी १५ ते २० हजारापर्यंत लागवड खर्च येतो. त्यात शेतकºयांचे परिश्रम वेगळे. शेतकºयांची सर्व भीस्त सोयाबीन पिकावर होती. खरीप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकरी हे रब्बी हंगामातील पिकांवर भर देत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ५० हजार हेक्टरावर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. किड नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. अशातच वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून हरभरा पिकाची नासाडी चालविल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. माकडाचे कळप हे शेतात ठाण मांडून पिकांचे नुकसान करीत असल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली. गावस्तरीय समिती करते पाहणीसरपंच, तलाठी, कृषी सहायक व वनविभागाचा एक कर्मचारी अशा चार जणांची मिळून गावस्तरावर एक समिती असते. शेतकºयाची तक्रार प्राप्त झाल्यास ही समिती पाहणी करते. पिकाचे नुकसान हे वन्यप्राण्यांनी केले की नाही हे ठरविण्यात वन कर्मचाºयाची भूमिका महत्वाची असते. वन्यप्राण्यांकडून किती प्रमाणात नुकसान झाले, याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जातो. मंजूरीनुसार शासन नियमानुसार भरपाई देण्यात येते. मात्र, या समितीसंदर्भात बहुतांश शेतकरी अनभिज्ञ असल्याने नुकसानभरपाईसंदर्भात प्रस्तावही नगण्यच येतात. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास गावस्तरीय समितीकडून पाहणी केली जाते. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शासन नियमानुसार संबंधित शेतकºयांना भरपाई मिळते.- सुमंत सोळंकेउपवनसंरक्षक, वाशिम खरीप हंगामात अगोदरच अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकºयांना गारद केले आहे. आता वन्यप्राण्यांनी शेतात ठाण मांडून रब्बी पिकांचे नुकसान चालविले आहे.- गौतम भगत, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीwildlifeवन्यजीव