शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रानडुक्कर, रोहींनी केले मक्याचे पीक फस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:43 IST

वाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे. वाशिमपासून जवळच असलेल्या तामसी फाट्यानजिकच्या शेतात २९ जुलैच्या रात्री रानडुक्कर आणि रोहिंनी अक्षरश: हैदोस घालून शेतात बहरलेले मक्याचे पीक फस्त केल्याचा प्रकार घडला.याबाबत प्राप्त माहितीनुसार, तामसी फाट्यानजिक सामाजिक कार्यकर्ते तथा गीर गो-पालक रवी मारशेटवार यांची पाच एकर शेती आहे. जांभरूण परांडे या गावातील शेतकऱ्यांचीही याच शिवारात शेती असून गत काही दिवसांपासून उभ्या पिकात दिवसा व रात्री रानडुकरांचे कळप शिरत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करित आहेत. २९ जुलैच्या रात्रीदेखील रानडुकरांच्या भल्यामोठ्या कळपाने रवी मारशेटवार यांच्या शेतातील मका आणि हळद पीक उध्वस्त केले. मारशेटवार यंच्या शेताला लागून असलेल्या रामकिसन काळबांडे याच्या शेतातही या वन्यप्राण्यांनी शिरकाव करून डाळींबाच्या बागेत हैदोस घातला. तथापि, वन्यप्राण्यांकडून शेतात होणाºया नुकसानाची वन विभागाने तुटपुंज्या स्वरूपात भरपाई देण्यापेक्षा वन्यप्राण्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा. यामुळे किमान गोरगरिब शेतकºयांच्या तोंडचा घास तरी हिरावला जाणार नाही, अशी मागणी रवी मारशेटवार यांनी केली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीwildlifeवन्यजीव