शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

जलयुक्त कामांमुळे पाणीटंचाई दूर होईल - आमदार राजेंद्र पाटणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:36 PM

या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. कारंजा-मानोरा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांचे पावसाळ्यापुर्वी आराखडे तयार करून मोठ्या प्रमाणात कामे करण्याचा प्रयत्न केला. या कामांमुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ग्राम मोखड (पिंप्री) येथील कामांची पाहणी करताना ते बोलत होते.कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, सरपंच, उपसरपंच, जि.प.सदस्य मिना भोने व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत असे सांगून पाटणी म्हणाले की पावसाळ्यापुर्वी कृती आराखडा तयार करून जलयुक्तची कामे मार्गी लावली आहेत. ग्रामीण भागातील नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरणासोबतच पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरूस्ती, नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करून ज्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे अशा गावात ताळेबंदानुसार पाण्याची गरज लक्षात घेता कार्यक्रम राबविण्यात आले. भविष्यात टंचाईग्रस्त गावात पाणी पुरवठा योजना उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे मत पाटणी यांनी व्यक्त केले. यावेळी ६२ लाख रुपये किंमतीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गतच्या कामाला शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणेश इसळ यांनी केले. यावेळी अनिल कानकिरड, दिगंबर गोडसे, ज्ञानेश्वर ठाकरे, विजय गोडसे, गणेश ईसळ, गणेश राऊत, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी बोबडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीKaranjaकारंजा