शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; मंगरुळपीरवासियांना ११ दिवसांतून एकदा पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 5:15 PM

​​​​​​​वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.   येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे.

वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, शहरवासियांना ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोतसावंगा धरणात अत्यल्प पाणीसाठा उरल्याने भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने नगर परिषद प्रशासनाने पाणी वापराबाबत नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मंगरुळपीर शहराला तालुक्यातील मोतसावंगा येथील धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु यंदा अल्प पावसामुळे या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने शहरवासियांना गेले काही दिवस आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता ११ दिवसांत एकदा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.  सद्यस्थितीत या धरणात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. मोतसावंगा धरणातून मंगरुळपीर शहरासह तालुक्यातील इतरही काही गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत या धरणातील पाणी टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह अपव्यय टाळण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन नियोजन करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासह एकूण १५ प्रकल्पांत मिळून ९ टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यातच चांदई, कवठळ, सिंगडोह, मोहरी, सावरगाव, दस्तापूर आणि सार्सी बोथ या प्रकल्पांत शुन्य टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी