शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाणीटंचाई; महिलांचा करंजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:37 IST

महिलांनी अखेर शुक्रवार, २१ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सरपंच, सचिवासह तलाठ्यास चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी (वाशिम) : प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींवरून नळाव्दारे पाणी मिळण्यास १२ ते १५ दिवसांचा विलंब लागत आहे. या समस्येला त्रासलेल्या महिलांनी अखेर शुक्रवार, २१ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सरपंच, सचिवासह तलाठ्यास चांगलेच धारेवर धरले.करंजी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. गावातील सर्वच हातपंप नादुरूस्त आहेत. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायतीने २० एप्रिल २०१९ पासून किसन खाडे, ज्ञानबा विढोळे, माधव लहाने यांच्या विहिरी अधिग्रहीत केल्या. त्यावरून नळ योजनेव्दारा पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र पाण्याचे समसमान वाटप होत नसल्याने १२ ते १५ दिवस पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या समस्येला वैतागलेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून सरपंच सुरेश पाटील, सचिव व्ही.एस. नवघरे, तलाठी व्ही.एल. अवचार यांना धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबन लहाने, प्रदिप लहाने यांची उपस्थिती होती. दरम्यान, हातपंपांची दुरूस्ती करून पाण्याचे समसमान वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव घेवून हा प्रश्न निकाली काढेन, असे आश्वासन पदाधिकाºयांनी मोर्चेकरी महिलांना दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन