शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाणीटंचाई; महिलांचा करंजी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:37 IST

महिलांनी अखेर शुक्रवार, २१ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सरपंच, सचिवासह तलाठ्यास चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्ककरंजी (वाशिम) : प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींवरून नळाव्दारे पाणी मिळण्यास १२ ते १५ दिवसांचा विलंब लागत आहे. या समस्येला त्रासलेल्या महिलांनी अखेर शुक्रवार, २१ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून सरपंच, सचिवासह तलाठ्यास चांगलेच धारेवर धरले.करंजी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. गावातील सर्वच हातपंप नादुरूस्त आहेत. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायतीने २० एप्रिल २०१९ पासून किसन खाडे, ज्ञानबा विढोळे, माधव लहाने यांच्या विहिरी अधिग्रहीत केल्या. त्यावरून नळ योजनेव्दारा पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र पाण्याचे समसमान वाटप होत नसल्याने १२ ते १५ दिवस पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या समस्येला वैतागलेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून सरपंच सुरेश पाटील, सचिव व्ही.एस. नवघरे, तलाठी व्ही.एल. अवचार यांना धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबन लहाने, प्रदिप लहाने यांची उपस्थिती होती. दरम्यान, हातपंपांची दुरूस्ती करून पाण्याचे समसमान वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव घेवून हा प्रश्न निकाली काढेन, असे आश्वासन पदाधिकाºयांनी मोर्चेकरी महिलांना दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन