शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

राजूरा परिसरातील गावांना पाणीटंचाईच्या झळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:29 IST

  राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

- यशवंत हिवराळे   राजूरा (वाशिम) : परिसरातील अनेक गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विशेषत: महिलांना डोईवर हंडा घेवून पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करून ग्रामस्थांना जाणवणारी समस्या दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.कधीकाळी संपूर्ण मालेगाव शहराची तहान भागवून राजूरा परिसरातील कुरळा, सुकांडा, राजूरा, डव्हा, नागरतास येथील शेकडो हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरविणाºया कुरळा तलावाची देखभाल-दुरुस्ती व योग्य नियोजनअभावी आजमितीस दुरवस्था झालेली आहे. या तलावातील पाण्याच्या भरोशावर सुकांडा, कुरळा, नागरतास आदी गावांमधील शेतकºयांकडून गव्हाचे विक्रमी उत्पन्न घेतले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षात पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन व तलावात दरवर्षी साचणाºया गाळामुळे तलावाची पाणीपातळी वर्षागणिक खालावत चालली आहे. यंदा देखील सद्या या तलावात जेमतेम पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. कुरळा तलाव हा जवळपास ५४ हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे. या तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी फार जुनी आहे. अनेकदा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, जनतेच्या पदरी आश्वासनाखेरीज काहीच पडू शकले नसल्याचे वास्तव आजही कायम आहे. राजूरा येथून जवळच असलेल्या खैरखेडा येथील जलस्वराज्य प्रकल्पाचा जलस्त्रोत देखील निकामी ठरला आहे. परिणामी, नदीपात्रातील ज्या पाण्यावर गुरे, ढोरे, कुत्रे पाणी पितात, महिला धुणे धुतात, त्याच झºयातील दुषीत पाण्यावर दरवर्षीच्या उन्हाळ्यात खैरखेडा येथील ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत असल्याची भयावह स्थिती आहे.खैरखेडा हे मालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीसमस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु त्याचा विशेष फायदा झालेला नाही. तथापि, यावर्षी देखील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ती निकाली काढण्याकरिता टँकरव्दारा तत्काळ पाणीपुरवठा सुरू करणे गरजेचे ठरत आहे.राजूरा येथून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या सुकांडा या गावातही दरवर्षीप्रमाणे यंदा एप्रिलच्या सुरूवातीपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन हजारावर लोकसंख्या असलेल्या सुकांडा येथे काही वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प कार्यान्वित झाला. मात्र, या योजनेला पाणीपुरवठा करणारा जलस्त्रोतच ‘वांझोटा’ ठरल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्या ग्रामस्थांची तहान भागविणाºया गावातील सार्वजनिक पाच विहीरी, सहा हातपंपासह खासगी कुपनलिकांनी दम तोडला आहे. त्यामुळे प्रशासनाने गावात तत्काळ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई