शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांसाठी निर्माण केले पानवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 5:53 PM

निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत.

वाशीम : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्या वाचून पक्षांची होणारी तळमळ थांबावी याकरिता वाशीम येथील निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत. यामुळे पक्षांना त्याची वस्ती असणाऱ्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. वाशीम येथील सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृपच्यावतीने दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे प्रदूषण आणि जागतिक उष्मांकाचा आकडा वाढत असल्यामुळे अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले,अनेक पक्षी आणि प्राणी मात्रांचे जीवन धोक्यात आलेत म्हणून निसर्गाशी व प्राणीमात्रांविषयी जवळीक साधून निर्सग व्यासंगी मंडळींनी पुढे येवून या संकटाचा वेळीच सामना करणे अत्यंत करणे गरजेचे आहे. भविष्यात चिमणी हा प्राणी कसा असतो हे सांगण्याची वेळ येवू नये म्हणून सावली प्रतिष्ठानच्यावतीने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन गत काही वर्षापासून करण्यात येत आहे. पक्ष्यासाठी पाणपोई हा उपक्रम शहरात राबविण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी साहित्य जमा करण्यासाठी टाकाऊ वस्तुंचा वापर केला, त्यामध्ये रेल्वे स्थानकावर फेकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जमा करण्यात आल्या ,शेतातील साधारण: सुकलेल्या तुरीच्या खोडक्या जमा करुन त्यापासून तिपाई तयार करण्यात आली, जेवढे पाणी कमी झाले तेवढाच पाण्याचा पुरवठा मातीच्या भांड्यात होण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. भांडयातील पाणी जास्तीत जास्त टिकण्यासाठी सी.एस.एल. या तंत्राचा वापर प्रत्येक पाणपोईला करण्यात आला आहे.

निसर्ग व्यासंग वृध्दिंगत होउन पर्यावरण संवर्धन चळवळीला गती देण्यासाठी सावलीने बच्चे कंपनीला सहभागी करून निसर्ग व्यासंगाचे बाळकडूच दिले आहेत. बच्चे कंपनी देखिल या उपक्रमाचा नैसर्गिक आनंद घेत आहेत. आजवर आपल्या घरात वावरायची अंगणात धान्य निवडताना चार दाणे टाकले की पक्षाचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा आणि भुर्रकन उडूनही जायच्या अंगणात घराच्या आडोशाला अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोंच्या मागे पक्षी घरटे सहज तयार व्हायचे असे मात्र आता कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. मुक्या जीवांची तृष्णातृप्ती करण्यासाठी नागरीकांनी पानवठ्यात पाणी भरण्याचे आवाहन सावली प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव