शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुराचे पाणी घुसले शेतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:47 IST

वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह परिसरातील शेकडो हेक्टर शेतांत हे पाणी घुसले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त प्रकाशित करून या संदर्भात महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते, हे विशेष.शेलुबाजार : शुक्रवारी दुपारनंतर शेलुबाजार परिसरातील गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंझरा, पिंप्री अवगण या गावात धो-धो पाऊस कोसळल्याने नदीनाल्याना पुर आला. यामुळे पेरणी केलेली बियाणे वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३२ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.मंगरुळपीर ते शेलूबाजार दरम्यान राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाच्यावतीने रस्त्याचे काम सुरु आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलूबाजार व खंड्या नाल्याच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. पुलाचे काम करताना वाहतुकीसाठी योग्यरित्या पर्यायी रस्ता तयार केला नाही तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे कामही केले नाही. शुक्रवारी पहिल्याच पावसामुळे पूर आल्याने सायंकाळी ४ वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मंगरुळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे पहिल्याच पावसात वाहनधारकांसह शेतकºयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अडान नदीच्या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार करताना पाईप टाकणे गरजेचे होते. परंतु पाईप टाकण्यात आले नाहीत. अडान नदी व खंड्या नाल्याला आलेल्या पुरामुळे निर्माणाधिन पुलाला धक्का बसण्याची भीती वर्तविली जात आहे. पुरामुळे अडाण नदीवरील पुलाखाली उभारण्याच्या आलेल्या ‘सेंट्रींग’चा काही भाग खाली कोसळला.‘लोकमत’ने वेधले होते प्रशासनाचे लक्षजिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नाल्याच ठेवल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात जाऊन नुकसान होण्याची शक्यता ‘लोकमत’ने २७ जूनच्या अंकात वर्तवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, याऊपरही याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. २८ जून रोजी शेलुबाजार परिसरात धो-धो पाऊस झाला असून, या पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी पात्रावर पूल बांधकाम सुरू असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या ठेवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेकडो एकर शेतीत पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यातील काही क्षेत्रात शेतकºयांनी पेरणीही केली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी