शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

वाशीम : मानोरा तालुक्यात पाणी पेटले; पाच तास रास्तारोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:33 IST

मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देवीजपुरवठा पूर्ववत केल्यानंतर आंदोलन मागे महिलांनी धारण केला रुद्रावता; टपावर चढून रोखली महामंडळाची बस

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा /दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. गावक-यांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.गत तीन-चार वर्षांपासून दापूरा येथील नगारिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची मागणी गावातील सर्वपक्षीय पुढारी, युवकांनी शासन व प्रशासनदरबारी केली होती. या मागणीचा पाठपुरावादेखील केला. मात्र, कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे पाहून गावातील गिताबाई रूंदन राठोड यांनी बागायतीसाठी करण्यात आलेली पाईपलाईन ही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणून दिली. म्हसणीच्या धरणावरून पाण्याची सोय उपलब्ध केली. यासाठी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राकडून वीजपुरवठा घेण्यात आला. मात्र, या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा प्रशासनातर्फे खंडित करण्यात आला. गत एका महिन्यापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी गावक-यांकडून तहसिलदारांकडे केली जात आहे. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने आणि गावात तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने शेवटी शुक्रवारला गावक-यांच्या संयमाचा बांध फुटला. मानोरा-कारंजा मार्गावर दापूरा फाटा येथे सकाळी १० वाजतापासून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तहसिदार डॉ. सुनील चव्हाण यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता तहसिलदारांनी मौन धारण केले. ठोस तोडगा निघत नसल्याचे पाहून महामंडळाच्या बसवर चढून महिलांनी बस अडविली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीजजोडणी करण्यात आली. त्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी जि.प.सदस्य अनिता राऊत, पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, सरपंच तुळशिराम गावंडे, सरपंच भारत दरेकार, धनराज दिघडे, प्यारेलाल राठोड, शिवसेना शाखा प्रमुख पकंज चव्हाण यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनWaterपाणी