शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

वाशीम : मानोरा तालुक्यात पाणी पेटले; पाच तास रास्तारोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:33 IST

मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देवीजपुरवठा पूर्ववत केल्यानंतर आंदोलन मागे महिलांनी धारण केला रुद्रावता; टपावर चढून रोखली महामंडळाची बस

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा /दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. गावक-यांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.गत तीन-चार वर्षांपासून दापूरा येथील नगारिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची मागणी गावातील सर्वपक्षीय पुढारी, युवकांनी शासन व प्रशासनदरबारी केली होती. या मागणीचा पाठपुरावादेखील केला. मात्र, कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे पाहून गावातील गिताबाई रूंदन राठोड यांनी बागायतीसाठी करण्यात आलेली पाईपलाईन ही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणून दिली. म्हसणीच्या धरणावरून पाण्याची सोय उपलब्ध केली. यासाठी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राकडून वीजपुरवठा घेण्यात आला. मात्र, या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा प्रशासनातर्फे खंडित करण्यात आला. गत एका महिन्यापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी गावक-यांकडून तहसिलदारांकडे केली जात आहे. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने आणि गावात तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने शेवटी शुक्रवारला गावक-यांच्या संयमाचा बांध फुटला. मानोरा-कारंजा मार्गावर दापूरा फाटा येथे सकाळी १० वाजतापासून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तहसिदार डॉ. सुनील चव्हाण यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता तहसिलदारांनी मौन धारण केले. ठोस तोडगा निघत नसल्याचे पाहून महामंडळाच्या बसवर चढून महिलांनी बस अडविली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीजजोडणी करण्यात आली. त्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी जि.प.सदस्य अनिता राऊत, पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, सरपंच तुळशिराम गावंडे, सरपंच भारत दरेकार, धनराज दिघडे, प्यारेलाल राठोड, शिवसेना शाखा प्रमुख पकंज चव्हाण यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनWaterपाणी