शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाशीम : मानोरा तालुक्यात पाणी पेटले; पाच तास रास्तारोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:33 IST

मानोरा/दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देवीजपुरवठा पूर्ववत केल्यानंतर आंदोलन मागे महिलांनी धारण केला रुद्रावता; टपावर चढून रोखली महामंडळाची बस

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा /दापूरा : मानोरा तालुक्यातील दापूरा येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाही, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहून संतप्त गावक-यांनी शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी मानोरा-कारंजा मार्गावरील दापूरा फाट्यावर तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले. गावक-यांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.गत तीन-चार वर्षांपासून दापूरा येथील नगारिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची मागणी गावातील सर्वपक्षीय पुढारी, युवकांनी शासन व प्रशासनदरबारी केली होती. या मागणीचा पाठपुरावादेखील केला. मात्र, कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे पाहून गावातील गिताबाई रूंदन राठोड यांनी बागायतीसाठी करण्यात आलेली पाईपलाईन ही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणून दिली. म्हसणीच्या धरणावरून पाण्याची सोय उपलब्ध केली. यासाठी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राकडून वीजपुरवठा घेण्यात आला. मात्र, या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा प्रशासनातर्फे खंडित करण्यात आला. गत एका महिन्यापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी गावक-यांकडून तहसिलदारांकडे केली जात आहे. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने आणि गावात तिव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने शेवटी शुक्रवारला गावक-यांच्या संयमाचा बांध फुटला. मानोरा-कारंजा मार्गावर दापूरा फाटा येथे सकाळी १० वाजतापासून रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तहसिदार डॉ. सुनील चव्हाण यांनी दुपारी १२ वाजता घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता तहसिलदारांनी मौन धारण केले. ठोस तोडगा निघत नसल्याचे पाहून महामंडळाच्या बसवर चढून महिलांनी बस अडविली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून दुपारी ३ वाजताच्या सुमारास वीजजोडणी करण्यात आली. त्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी जि.प.सदस्य अनिता राऊत, पंचायत समिती सदस्य मधुसूदन राठोड, गजानन भवाने, शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, सरपंच तुळशिराम गावंडे, सरपंच भारत दरेकार, धनराज दिघडे, प्यारेलाल राठोड, शिवसेना शाखा प्रमुख पकंज चव्हाण यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनWaterपाणी