शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 4:10 PM

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली.

ठळक मुद्देमकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. गावभरात सफाई अभियान राबविले; स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली. यामध्ये गावातील युवक मंडळीसह न्यायपालिकेतील मानद न्यायदंडाधिकारी, शिक्षक आणि इतर अधिकाºयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

मकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण असताना आणि या दिवशी सूर्याचे दक्षिणायन होत असल्याने हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. गावकºयांनी मकर संक्रांतीच्या औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप मोरे, रजेवर आलेले भारतीय सैनिक शंकर वैरागडे, अनिल कढणे, राष्ट्रपाल जाधव, अ‍ॅड. सिद्धार्थ जाधव, वरिष्ठ लिपिक नामदेव वानखडे, लिपिक पांडुरंग गोटे, धनराज गोटे, निलेश वायचाळ, शिक्षक गोपाल तापडिया, मनोज गोटे, विकास मोरे, संतोष वायचाळ, संतोष कढणे, विकास वायचाळ, विनायक वायचाळ, कैलास वायचाळ, राजकुमार वायचाळ, पोलीस कर्मचारी दिलिप जाधव, शाळा सुधार समिती अध्यक्ष शामराव वायचाळ, तंटामूक्ती अध्यक्ष भारत खंडारे, पोलीस पाटील विजय जाधव, उपसरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वायचाळ, गजानन कढणे, सुभाष मोरे, संजय मोरे, गणेश वायचाळ, किशोर वायचाळ आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

दंवडी देऊन   आवाहन

राजगावचे सरपंच अरविंद अहिरे पाटील यांच्या नेतृत्वात गावात स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश देण्यासाठी चक्क्क दंवडी देण्यात आली. या दंवडीद्वारे गावकºयांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि राजगावातील मूळ रहिवासी पंढरी गोटे यांच्यासह विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील आणि प्राध्यापक मंडळींनी यात सहभाग घेतला. 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान