शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : वारा जहाँगिर सिंचन प्रकल्पातील पाण्यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:11 IST

देपूळ  :  शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर  हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई  देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून गुरुवारी केली.

ठळक मुद्देवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चासिंचन प्रकल्पावरील उपसा बंदी हटवा नाहीतर नुकसान भरपाई द्या!रब्बीच्या पेरणीनंतर बंदी चुकीची

देपूळ  :  शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर  हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई  देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून गुरुवारी केली. तसेच रब्बी पेरणीनंतर उपश्यावर बंदी आणल्याने शेतकºयांचे मोठे प्रमाणात नुकसानाची संभावना सुध्दा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या पदमा मोतीराम सोनोने,  राजेंद्र सारंगधर गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली देपूळ परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून आपबिती कथन केली व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. वारा जहाँगीर, देपूळ , उमरा शमशोद्दीन, उमरा कापसे, देगाव , काजळंबा , बोरी ही गावे आधीच   दुष्काळग्रस्त आहे.  या भागता शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण वाढलेले असल्याने शेतकºयांच्या आर्थिक बळकटीकरणास्तव १७९० हेक्टर सिंचन प्रकल्प वारा येथे उभारण्यात आला होता. या प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याची मागणी नंसताना केवळ  मुख्यमंत्र्याच्या आदेशान्वये उपसा सिंचनावर बंदी घालण्यात आली . या बंदीमुळे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसानाची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

ही बंदी घालण्यासंदर्भात जर पुर्व कल्पना दिली असती , तर या परिसरात रब्बी पिकाची पेरणी झाली  नसती.  रब्बी पिक अर्ध्यावर असताना पााणी उपसावर बंदी आणल्याने शेतकºयांची पिके सुकू लागल्याने ही पिके धोक्यात आली आहे . सोसाबीन पिकले नाही,  तुरीचे पिक वांझ झाल, े कपासी बोंड अळीने धोक्यात आली.  त्यामुळे कर्ज फेडणे तर सोडा आमचे जगने कठीण होवून बसले असल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी व्यक्त करीत आहे. 

जिल्हयातील अनेक प्रकल्पातील सिंचन उपश्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शेतकºयांनी ज्या प्रकल्पाच्या आधारावर पेरणी केली त्यांनी आता काय करावे असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. पिकांना पाणी न मिळाल्यास शेकडो हेक्टरवरील पेरणी पूर्णपणे वाया जाणार असल्याने याची नुकसान भरपाई प्रशासनाने देण्याचीमागणी शेतकरी करीत आहेत.

५० टक्के जलसाठा द्या

 प्रकल्पामध्ये असलेल्या जल साठयामधून ५० टक्के जलसाठा सिंचनासाठी वापरण्यास परवानगी दया अन्यथा हेक्टरी ५० हजार रुपये अनूदान दया अशी मागणी पदमा मोतीराम सोनोने , राजेंद्र गंगावणे, शंकर गंगावणे, गजानन गंगावणे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून शेतकºयांच्यावतीने केली आहे. 

 आमच्या मागण्या गांभिर्य पूर्वक विचार न झाल्यास  व पिक धोक्यात येवून उपासमारीने आमचे जिवन धोक्यात आल्यास त्याला शासन जबाबदार राहील असे वारा, देपूळ ,देगाव, काजळंबा, बोरी, उमरा शम , उमरा कापसे येथील शेतकरी बोलत आहे. 

 

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाई आहे यात दूमत नाही. पिण्याकरीताही पाणी आवश्यक आहे परंतु शेतात पेरलेले पिकांनाही पाण्याची आवश्यकता पाहता पिके वाचविण्यापुरते तरी पाणी प्रशासनाने घेवू देण्यास हरकत नसावी. असे न झाल्यास शेतकºयांनी व्याजाने, उसनवारीने पैसे घेवून घेतलेले पीक पूर्णपणे नष्ट होईल. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.        

- पदमा मोतीराम सोनोने, सामाजिक कार्यकर्त्या, देपूळ 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनDamधरण