स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अग्रेसर!

By Admin | Updated: May 7, 2017 19:25 IST2017-05-07T19:25:13+5:302017-05-07T19:25:13+5:30

स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अग्रेसर ठरल्याचे जिल्हा प्रशासनाने शनिवारी कळविले.

WASHIM DISTRICT FOR PRESIDENT OF SOUL INDIA! | स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अग्रेसर!

स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अग्रेसर!

वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा ह्या तीन नगर पालिका हगणदरीमुक्त झाल्या आहे. यायोगे स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अग्रेसर ठरल्याचे जिल्हा प्रशासनाने शनिवारी कळविले.
वाशिम जिल्ह्यातील शहरी भागात ८ हजार ८६८ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम आजमितीस पूर्ण झाले असून ग्रामीण भागात ३८ हजार १३७ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्वच्छतेच्या या वाटेवर जिल्ह्याची ह्यघोडदौडह्ण यापुढेही कायम राहील, असा आशावाद जिल्हा प्रशासनाने पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे. 

Web Title: WASHIM DISTRICT FOR PRESIDENT OF SOUL INDIA!