शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वृक्षलागवड मोहिमेचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:28 PM

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात ४२.३३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतील अंतिम टप्पा असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याला ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे यांच्यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, १ जुलै ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला प्राप्त झालेले उद्दिष्ट सर्व शासकीय विभागांना विभागून देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार सर्व यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही सुरु करावी. या मोहिमेत सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा परिषदेचे भुमिका महत्त्वाची असून त्यांनी त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करावे. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या शेतक?्यांच्या बांधावर वृक्ष लागवड योजनेतून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सहाय्यक वन संरक्षक  वायाळ यांनी यंत्रणानिहाय उद्दिष्ट व मोहिमेचे नियोजन याविषयी माहिती दिली.

टॅग्स :washimवाशिमcollectorजिल्हाधिकारी