शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

वाशिम जिल्ह्यात दिवसाकाठी ४० रोहित्र नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:29 PM

Mahavitran News २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. वाढत्या वीजभारामुळे दिवसाला सरासरी ४० रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे शेतकºयांना सिंचनात अडचणी येत आहेतच शिवाय बंद पडणाºया रोहित्रांमुळे महावितरणची डोकेदुखीही वाढली आहे. जिल्ह्यात २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीज पुरवठा देण्याच कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमीअधिक दाबामुळे रोहित्र जळण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रांतील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. तथापि, रब्बी हंगामाला सुरुवात होताच या प्रकारात लक्षणीय वाढ होते. सद्यस्थितीत हीच समस्या शेतकरी आणि महावितरणला त्रस्त करून सोडत आहे. रब्बी हंगामासाठी विजेची मागणी वाढली असताना रोहित्रांवर भार वाढून दिवसाला सरासरी ४० तर महिन्याकाठी ७०० ते ८०० रोहित्र नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात विविध वीज उपकेंद्रांतर्गत मिळून २८२ वीज रोहित्र बंद असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.

अनधिकृत जोडण्या आणि विजेच्या वाढलेल्या वापरामुळे रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र दुरुस्त करून ऑईल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.-आर. जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र