शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाशिम: खरीप पीकविम्याचा १३२४४ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 10:53 AM

Washim News १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा काढणाऱ्या आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्यापोटी या शेतकऱ्यांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई मिळणार असून, त्यापैकी २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ८०९ कोटी रुपयांचा भरणा पीकविमा कंपनीकडे केला होता. यंदाच्या हंगामात विविध स्थानिक नैसर्गिक आपत्तीसह परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात सोयाबीनच्या नुकसानाचे प्रमाण अधिक होते. या नुकसानापोटी शेतकऱ्यांनी पीकविमा मिळण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफ लाईन पद्धतीने रितसर अर्ज केले. या अर्जानुसार पीकविमा कंपनीने सर्वेक्षण केले असता प्रत्यक्ष स्थानिक आपत्तीने ५ हजार ६६१ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे  नुकसानापोटी या शेतकऱ्यांना ९३.४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे, तर काढणी पश्चात परतीच्या पावसामुळे  ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले असून, या शेतकºयांना नुकसानपोटी ५ कोटी ९१  लाख८९ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. अर्थात दोन्ही प्रकारातील नुकसानापोटी एकूण १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५.३३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून, एकूण २२९१ शेतकºयांच्या खात्यात ९० लाख ४९ हजार रुपयांची रक्कमही जमा करण्यात आली आहे.  पीकविम्याचा लाभ मिळालेले शेतकरी प्रकार                     शेतकरी संख्या     रक्कमस्थानिक आपत्ती         ५६६१             ९३.४४ काढणी पश्चात           ७५८३            ५९१.८९ ------------------------------------- एकूण                    १३२४४              ६८५.३३ 

 ५ हजार शेतकरी वचिंत जिल्ह्यात स्थानिक आपत्ती आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी १८ हजारांहून अधिक शेतकºयांनी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने तक्रारी केल्या. तथापि, यात निकषात  न बसल्याने आणि तक्रारीस विलंब झाल्याने ५ हजारांहून अधिक शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळू शकला नाही.   खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी २ हजार २९१ शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही मंजूर झाली आहे. -शंकरराव तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा