शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

ग्रामीण भागातील दक्षता समित्या ‘कागदावर’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:12 IST

मानोरा : रेशन धान्य, केरोसीन पुरवठा पारदर्शक व्हावा, सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या. परंतु केवळ मासिक बैठकीला हजेरी लावण्यापर्यंतच या समित्यांचे कार्य मर्यादीत झाल्याने अनेक समित्या केवळ ‘कागदा’वरच असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : रेशन धान्य, केरोसीन पुरवठा पारदर्शक व्हावा, सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या. परंतु केवळ मासिक बैठकीला हजेरी लावण्यापर्यंतच या समित्यांचे कार्य मर्यादीत झाल्याने अनेक समित्या केवळ ‘कागदा’वरच असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीवर अंकुश राहावा, वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी, ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा व्हावा यासाठी तालुकास्तरीय दक्षता समिती गठीत करण्यात येते. याप्रमाणेच गावपातळीवरही दक्षता समितीचे गठण केले जाते. तालुक्यात होणारा धान्य पुरवठा खरोखरच गोरगरीब जनतेपर्यंत पोहचतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी या समितीची आहे. परंतू, नियमित तपासणीच केली जात नाही. इ-पॉश मशीनवर वृध्द, गोरगरीब जनतेचे ठसे उमटत नाहीत, तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे या लाभार्थींचे म्हणणे आहे. या तक्रारीकडेही समितीचे लक्ष नसल्याचे दिसून येते. काही ग्राहक रोजगाराच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत; त्यांच्या नावावर येणाºया धान्याची उचल कशी होते आदी बाबींकडे स्थानिक दक्षता समितीने प्रत्यक्ष स्थानिक रेशन वितरकांकडे भेटी देणे आवश्यक आहे. शिवाय रेशन धान्य दुकानदाराने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागास फलक लावणे आवश्यक आहे. दर फलक लावताना किती मालाची उचल झाली, किती माल शिल्लक आहे, त्या मालाचे शासकीय दर किती आहे व ग्राहकांना तो माल शासकीय दरात विकल्या जातो का, दुकानात तक्रारी नोंद वही ठेवण्यात आली आहे का आदी बाबींची पडताळणीही दक्षता समितीला करावी लागते. तालु्क्यातील अनेक रेशन दुकानांत दर्शनी भागात दरपत्रक लावले नाहीत. यावरून दक्षता समित्या केवळ मासीक बैठकीपुरत्या मर्यादीत उरल्याचा आरोप लाभार्थींमधून होत आहे. दक्षता समित्याची मासीक बैठक दर महिन्याला होत असते. परंतू, या बैठकीत घेतलेल्या ठरावाची  अंमलबजावणी फारशी होत नाही अशी ओरड  ग्रामीण भागातुन होत आहे. ग्रामीण भागात स्थानिक रेशन दुकानदार, केरोसीन वितरक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समिती गठीत आहे. त्या समितीचे अध्यक्ष सरपंच  असतात तर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व ग्रा.पं. सदस्य त्या समितीचे सदस्य आहेत. परंतु या समित्या केवळ कागदावरच पाहावयास मिळतात. ग्रामीण  भागातील समित्यांना आपल्या अधिकाराची जणू जाणीवच नाही, असा आरोप ग्रामीण भागातून होत आहे. 

तालुका दक्षता समितीच्या बैठका नियमित होतात. बैठकी दरम्यान वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी, यासाठी विविध ठराव घेतले जातात. तरीसुध्दा कुठे ग्राहकांची अडवणूक होत असेल तर त्यांनी दक्षता समितीकडे तक्रारी कराव्या.- सुदाम तायडेसदस्य, दक्षता समिती मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा