शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

vidhan sabha 2019 : आघाडी, युतीला बंडखोरांची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:58 IST

ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, इच्छूकांनी दंड थोपटत आपलीच उमेदवारी प्रबळ असल्याचा दावा केला आहे. एकापेक्षा एक वरचढ दावेदार असल्याने आणि सेना-भाजपा किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, युतीची घोषणा झाली नसल्याने तुर्तास तरी प्रत्येकाने स्वतंत्रपणे मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते. ऐनवेळी युती, आघाडी झाली तर इच्छूकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तिनही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या इच्छुकांनी संपर्क मोहिमा सुरू केल्याचे दिसून येते. गत विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघ हा काँग्रेसकडे तर वाशिम व कारंजा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा विजय साकारला होता.गतवेळेप्रमाणे यावेळीही प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार की युती, आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर युतीचे संकेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षात साशंकता असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग देत गॉड फादरच्या भेटीसाठी मुंबई, दिल्ली वारी सुरू केली आहे.ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर एकदा नशीब अजमावायचे, असा निर्धार कारंजा मतदारसंघात इच्छूकांनी केल्याची चर्चा केला. युतीत कारंजा मतदारसंघ भाजपाकडे गेला तर शिवसेनेचे इच्छूक प्रकाश डहाके नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर येथे बंडखोरीचे चित्र अवलंबून राहील तर दुसरीकडे शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेला तर आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुनर्वसन कसे करायचे हा प्रश्न भाजपापुढे राहील.रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित झनक यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख हे पूत्र नकुलसाठी कोणती भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील चित्र अवलंबून राहणार आहे. रिसोड मतदारसंघ हा भाजपाकडे गेला तर शिवसेना व शिवसंग्रामच्या इच्छूकंकडून बंडखोरी होणार नाही, याची दक्षता घेताना भाजपाच्या दिग्गजांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेना, भाजपाकडे ताकदीचे उमेदवार; थांबवायचे कुणाला ?गेल्या पाच वर्षात शिवसेना व भाजपने तिनही मतदार संघात तगड्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले होते; त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना व भाजपकडे ताकदीचे उमेदवार आहेत. आता युती झाली तर थांबवायचे कुणाला, असा पेच आहे. ‘बंडोबां’चे बंड थंड करण्याचे आव्हान शिवसेना-भाजपाच्या पक्षनेतृत्वासमोर राहणार आहे.

‘वंचित’कडून चाचपणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता तुर्तास तरी धुसर असल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात उमेदवार उभे करून तिसरा पर्याय देण्याची तयारी वंचितकडून चालविली जात आहे. सेना, भाजपा तसेच काँग्रेस, राकाँची युती, आघाडीची घडी विस्कटली तर रिसोड व कारंजा मतदारसंघात एखाद्या बंडखोराच्या गळ्यात वंचितची उमेदवारी पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना