शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

vidhan sabha 2019 : आघाडी, युतीला बंडखोरांची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:58 IST

ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, इच्छूकांनी दंड थोपटत आपलीच उमेदवारी प्रबळ असल्याचा दावा केला आहे. एकापेक्षा एक वरचढ दावेदार असल्याने आणि सेना-भाजपा किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, युतीची घोषणा झाली नसल्याने तुर्तास तरी प्रत्येकाने स्वतंत्रपणे मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते. ऐनवेळी युती, आघाडी झाली तर इच्छूकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तिनही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या इच्छुकांनी संपर्क मोहिमा सुरू केल्याचे दिसून येते. गत विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघ हा काँग्रेसकडे तर वाशिम व कारंजा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा विजय साकारला होता.गतवेळेप्रमाणे यावेळीही प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार की युती, आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर युतीचे संकेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षात साशंकता असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग देत गॉड फादरच्या भेटीसाठी मुंबई, दिल्ली वारी सुरू केली आहे.ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर एकदा नशीब अजमावायचे, असा निर्धार कारंजा मतदारसंघात इच्छूकांनी केल्याची चर्चा केला. युतीत कारंजा मतदारसंघ भाजपाकडे गेला तर शिवसेनेचे इच्छूक प्रकाश डहाके नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर येथे बंडखोरीचे चित्र अवलंबून राहील तर दुसरीकडे शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेला तर आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुनर्वसन कसे करायचे हा प्रश्न भाजपापुढे राहील.रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित झनक यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख हे पूत्र नकुलसाठी कोणती भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील चित्र अवलंबून राहणार आहे. रिसोड मतदारसंघ हा भाजपाकडे गेला तर शिवसेना व शिवसंग्रामच्या इच्छूकंकडून बंडखोरी होणार नाही, याची दक्षता घेताना भाजपाच्या दिग्गजांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेना, भाजपाकडे ताकदीचे उमेदवार; थांबवायचे कुणाला ?गेल्या पाच वर्षात शिवसेना व भाजपने तिनही मतदार संघात तगड्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले होते; त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना व भाजपकडे ताकदीचे उमेदवार आहेत. आता युती झाली तर थांबवायचे कुणाला, असा पेच आहे. ‘बंडोबां’चे बंड थंड करण्याचे आव्हान शिवसेना-भाजपाच्या पक्षनेतृत्वासमोर राहणार आहे.

‘वंचित’कडून चाचपणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता तुर्तास तरी धुसर असल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात उमेदवार उभे करून तिसरा पर्याय देण्याची तयारी वंचितकडून चालविली जात आहे. सेना, भाजपा तसेच काँग्रेस, राकाँची युती, आघाडीची घडी विस्कटली तर रिसोड व कारंजा मतदारसंघात एखाद्या बंडखोराच्या गळ्यात वंचितची उमेदवारी पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना