वारा जहॉगीर येथील शेतकरी करतोय ५३ वर्षापासून सेंद्रीय शेती
By Admin | Updated: May 15, 2014 22:44 IST2014-05-15T22:20:09+5:302014-05-15T22:44:23+5:30
किटक नाशकाचा वापर न करता उत्कृष्ट व कमी खर्चाची सेंद्रीय शेती करणारा वारा जहॉगीर येथील ७0 वर्षीय शेतकरी रामचंद्र ग्यानबा सुरटकर हा आदर्श ठरत आहे.

वारा जहॉगीर येथील शेतकरी करतोय ५३ वर्षापासून सेंद्रीय शेती
देपूळ : १९६१ पासून ते आज पावेतो ५३ वर्षाच्या कार्यकालात आपल्या शेतामध्ये किटक नाशकाचा वापर न करता उत्कृष्ट व कमी खर्चाची सेंद्रीय शेती करणारा वारा जहॉगीर येथील ७0 वर्षीय शेतकरी रामचंद्र ग्यानबा सुरटकर हा आदर्श ठरत आहे. शोतामध्ये रासायणीक खते व किटकनाशकाचे वाढते प्रमाणे यामुळे जमिनीची पोत कमी होत आहे व या पासून निघणारे पिके व फळेभाज्या व पालेभाज्या यातील जिवनसत्व कमी होत आहे. तसेच उत्पादन खर्चात झपाटयाने वाढ होत होत असल्याने शेतकर्यांना आपली शेती न परवडणारी ठररत आहे. आशातच एखाद्या शेतकर्यानी १९६१ सालापासून आपली शेती विना किटकनाशक व विना रासायणीक खताची व कमी खर्चात जादा उत्पन्न देणारी शेती करण्याचा उपक्रम वारा जहॉगीर येथील रामचंद्र ग्यानबा सुरटकर याशेतकर्यांनी राबविला आहे. हे विश्ोष. वाशिम तालुक्यातील वारा जहॉगीर येथे राहणार्या रामचंद्र सुरटकर यांच्याकडे ७ एकर शेती असून यातील ३ एकर शेती त्यांची बागायती आहे. यामध्ये ते सोयाबीन, तूर, ज्वारी, हरबरा, गहू, मेथी, पालक सांभार, गांजर, इत्यादी पिके घेतात. या पिकांना ते रासायणीक खताचा वापर करीत नाहीत. तर शेणखत वापरतात तर १९६१ पासून त्यांनी एकदाही आपल्या शेतात किटक नाशकाचा वापर केलेला नाही. त्यांच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ते गोमुत्र पानाच्या डाहाळया ने शेतात शिपडतात. या पध्दतीने शेती केल्याने १0 ते १५ टक्के उत्पन्नात मध्ये घट होते परंतु उत्पादनाची प्रत चांगली येऊन उत्पादन खर्चात मोठया प्रमाणो घट येते ही शेती पध्दती परवडणारी आहे असा त्यांचा अनुभव आहे.