शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लॉकडाऊनचा सदुपयोग; दाम्पत्याने २१ दिवसात अंगणात खोदली विहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 11:19 IST

वेळेचा सदुपयोग मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने करुन दाखविला.

ठळक मुद्देलॉकडाऊन मध्ये पंचविस फुट विहीर खोदुन काढली . गोड पाणी लागले लागल्यानंतर यांचा आनंद गगनात मावेनासे झाला. गावकऱ्यांनी या पतीपत्नीच्या कार्याचे कौतूक केले.

- बबनराव देशमुख  लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणुमुळे लॉक डाऊन करण्यात आले. जिल्हयातही संचारबंदी लागू केल्याने कुठेही जाता येणे शक्य नाही. अशातही आपला वेळ सदुपयोगी लावणारे अनेक जण पहावयास मिळतात. असाच वेळेचा सदुपयोग मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने करुन दाखविला. लॉक डाउननंतर २१ दिवसात पती पत्नीने विहिर खोदली. कोराणाचा फैलाव होऊ नये म्हणून नागरीकानी कोणीही घरा बाहेर पडता कामा नये, या साठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. घरात बसून काय करायचे असा प्रश्न पडल्यावर तालुक्यातील कारखेडा येथील पती पत्नीने घराच्या अंगणात चक्क एकविस दिवसात विहीरच खोदुन टाकली.  आता पर्यत च्या इतिहासात पहिल्यांदाच मिळालेल्या विश्रांतीच सोन केल.कारखेडा येथे अठ्ठावीस गावे पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत आहे; परंतु हि योजना या ना त्या कारणाने जास्त काळ बंदच राहते. याधी रस्त्याच्या कामामुळे तर आता पुरवठा योजनेचा पाईप लाईन फुटल्यामुळे हि योजना बंद होती . त्यामुळे सर्वच पाण्यासाठी ञस्त झाले होते . संचारबंदी असल्यामुळे पाण्यासाठी बाहेर जाण्याची भिती , बाहेर गेले तर पोलिस तर करायचे काय या विवंचनेत असलेल्या गजानन नारायणराव पकमोडे व त्यांची पत्नी पुष्पा गजानन पकमोडे यांनी चक्क एकविस दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये पंचविस फुट विहीर खोदुन काढली . विहीरीला गोड पाणी लागले लागल्यानंतर यांचा आनंद गगनात मावेनासे झाला.गजानन पकमोडे हे व्यवसायाने गवंडी काम करत असल्यामुळे सतत कामात राहण्याची सवय. परंतु लॉकडाऊन मुळे घरातच बसुन करायचे काय हा प्रश्न पडला व एक दिवस पतीपत्नीमध्ये सहज चर्चा झाली व विहिर खोदण्याचे ठरविले. ‘केल्याने होते रे आधी केले पाहिजे ’ या उक्तीप्रमाणे जसजसा वेळ मिळत गेला तसतसे काम करुन २१ दिवसात विहिर खोदून टाकली. गावकऱ्यांना हि बाब कळाल्यानंतर गावकऱ्यांनी या पतीपत्नीच्या कार्याचे कौतूक केले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा