शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

जहाल कीटकनाशकांचा वापर ठरतोय घातक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 5:49 PM

मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: खरीप पिकावरील किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांच्या वापरावर भर देत आहेत. यात सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्थुरॉन आणि प्रोफेनोफॉस यासारख्या कीटकनाशकांचा समावेश आहे. त्यामुळेच कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार वाढत असून, या किटकनाशकांचा वापर शेतर्कयांनी टाळावा, तसेच कृषीसेवा केंद्रानीही या कीटकनाशकांची विक्री करू नये, असे आवाहन कृषी विभाग करीत आहे.मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अमरावती विभागातील यतवमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी हा प्रकार गंभीर झाला होता, तर यंदाही अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या जिवाला धोका असल्याने कृषी विभाग व्यापक जनजागृती करण्यासह फवारणीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबवित आहेच; परंतु हा प्रकार घडण्यामागे जहाल कीकनाशकांचा वापर ही गंभीरबाबही कृषी विभागाच्या लक्षात आली आहे. प्रामुख्याने प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या कीटकनाशकाच्या मिश्रणामुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीतही कीटकनाशक विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजूर दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले असून, उपरोक्त कीटकनाशकांची विक्री होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्रत्यक्षात लाल त्रिकोणाची खुण असलेली कीटकनाशके मानवी आरोग्यास घातक असून, उपरोक्त कीटकनाशके त्याच प्रकारात मोडतात. त्यामुळे अशा कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी टाळावा, तसेच कृषीसेवा केंद्रांनीही अशा कीटकनाशकांची विक्री टाळून, हिरवे किंवा निळे त्रिकोणाची खुण असलेल कमीतकमी विषारी कीटकनाशकांच्या वापरास आणि विक्रीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे, तसेच प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या कीटकनाशकाच्या वापरापासून शेतकऱ्यांना व विक्रीपासून कृषीसेवा केंद्रांना परावृत्त करावे, अशा सुचना कृषी विभागाच्या कर्मचाºयांनाही देण्यात आल्या आहेत. यानंतरही कीटकनाशकाच्या विषबाधा प्रकरणात कृषीसेवा केंद्रांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कीटकनाशके कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.प्रोफेनॉस, सायपरमेथ्रीन, मोनोक्रोटोफॉस व डायफेन्थूरॉन या जहाल कीटकनाशकाच्या वापरामुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे या कीटकनाशकांची विक्री न करण्याचे आवाहन कृषी सेवा केंद्रांना करण्यात आले आहे, तसेच शेतकºयांनीही या कीटकनाशकांचा वापर करू नये !- डी. के. चौधरीउपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती