शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

लोणीफाटा परिसरात वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ...

पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४ हजार ‘पीपीई कीट’ शासनाने उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

शेलूबाजार परिसरात जंतुनाशक फवारणी

शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात सदोदित स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच, शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशकांची फवारणीही करण्यात आली.

रोजगारासाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना त्यांच्या गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या मजुरांना तसेच स्थानिक मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मजुरांनी मागणी नोंदविण्याचे आवाहन प्रशसानाने केले.

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवार व रविवारी करण्यात आली.

विळेगावातील हातपंप बंद

विळेगाव घुले : परिसरातील काही गावांमधील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्याची मागणी पंचायत समितीकडे वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त

मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ५६ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांनी केली.

रोहयोच्या कामाची देयके अदा करण्याची मागणी

तळप बु. : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शासनाने कुशल कामांचा निधी दिलेला नाही.

उन्हाची तीव्रता वाढली; जलस्रोत कोरडे

पोहरादेवी : यावर्षी मार्च महिन्यापर्यंत गावात पाणीटंचाई जाणवली नाही; मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जलस्रोतांमध्ये घट होत असून भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.