शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लोणीफाटा परिसरात वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ...

पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४ हजार ‘पीपीई कीट’ शासनाने उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

शेलूबाजार परिसरात जंतुनाशक फवारणी

शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात सदोदित स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच, शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशकांची फवारणीही करण्यात आली.

रोजगारासाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना त्यांच्या गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या मजुरांना तसेच स्थानिक मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मजुरांनी मागणी नोंदविण्याचे आवाहन प्रशसानाने केले.

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवार व रविवारी करण्यात आली.

विळेगावातील हातपंप बंद

विळेगाव घुले : परिसरातील काही गावांमधील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्याची मागणी पंचायत समितीकडे वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त

मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ५६ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांनी केली.

रोहयोच्या कामाची देयके अदा करण्याची मागणी

तळप बु. : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शासनाने कुशल कामांचा निधी दिलेला नाही.

उन्हाची तीव्रता वाढली; जलस्रोत कोरडे

पोहरादेवी : यावर्षी मार्च महिन्यापर्यंत गावात पाणीटंचाई जाणवली नाही; मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जलस्रोतांमध्ये घट होत असून भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.