संपूर्ण स्वच्छता अभियान कागदावर!
By Admin | Updated: May 25, 2014 00:09 IST2014-05-24T21:50:21+5:302014-05-25T00:09:03+5:30
वाशिम जिल्ह्यातील अनेक गावात अद्यापही शौचालयाचा अभाव

संपूर्ण स्वच्छता अभियान कागदावर!
वाशिम : संपूर्ण स्वच्छता अभियान जिल्ह्यातील अनेक केवळ कागदावरच उरलेले दिसून येत आहे. ग्रामीण भागात अनेक गावात घाणीच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात सापडत आहे. गावची समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत निर्मल ग्राम मोहीम सुरू करण्यात आलेली आहे परंतु, अनेक गावात शौचालये बांधली नाहीत.सर्वत्र हागणदरी सुरु आहेत. तसेच ग्रामीण भागत अनेक ठिकाणी खताचे ढिगचे ढिग दिसून येत आहेत. अनेक गावात हागणदारी अजून गावाच्या सुरूवातीलाच असल्याने गावात प्रवेश केल्याबरोबर दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.