शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Video - जामदराच्या शेतकऱ्यांची किमया, टोमॅटोतून 13 लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 15:46 IST

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. अडाण प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असताना पिकांच्या वाढीसाठी योग्य खतांचा प्रमाणानुसार प्रभावी करून त्यांनी ही किमया साधली आहे. जामदरा घोटी येथील गणेश गावंडे आणि विकास थेर यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटोचा दर्जा अतिशय चांगला आहे.

नरेश आसावा

इंझोरी (वाशिम) - वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी शिवारात अनेक शेतकरी रब्बी हंगामानंतर अडाण प्रकल्पातीन पाण्याच्या आधारे भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पादन घेतात. यंदाही येथील १५ ते २० शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. तथापि, यात विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून अवघ्या एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून योग्य नियोजनाच्या आधारे तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. अडाण प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असताना पिकांच्या वाढीसाठी योग्य खतांचा प्रमाणानुसार प्रभावी करून त्यांनी ही किमया साधली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे दोन्ही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांचे टोमॅटोचे उत्पादन दुप्पट असल्याने सर्वांसाठी हा आश्चर्याचा विषय ठरला आहे. अद्यापही त्यांच्या शेतातील टोमॅटोची झाडे फळांनी लदबदलीच असून, त्यांची ही शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी जामदरा घोटी येथे येत आहेत. 

दिल्लीच्या बाजारात विक्री

जामदरा घोटी येथील गणेश गावंडे आणि विकास थेर यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटोचा दर्जा अतिशय चांगला आहे. स्थानिक बाजारात त्या टोमॅटोला अपेक्षित दर मिळणार नाहीत.  ही जाण त्यांना होती. त्यामुळे अथक परिश्रम घेऊन पिकविलेल्या टोमॅटोला दरही चांगले मिळावे म्हणून त्यांनी दिल्लीच्या बाजारपेठेची निवड केली. त्यांनी आजवर सहा हजारांहून अधिक कॅरेट टोमॅटोची तोडणी करून ते दिल्लीच्या बाजारात विकले आहेत. प्रति कॅरेट ३०० ते ५०० रुपयांचे दर त्यांना या बाजारात मिळाले. आता उर्वरित टोमॅटोची काढणी करून त्यांची विक्रीही दिल्लीच्या बाजारात करण्याचे त्यांनी ठरविले आहे. दरम्यान, त्यांच्या या शेतीमुळे परिसरातील अनेक मजुरांच्या हातालाही काम मिळाल्याचे दिसत आहे.

आणखी ४ लाखांची आशा

जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे यांनी आजवर त्यांच्या टोमॅटो पिकातून तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित सर्वांना चकित केले असले तरी, अद्यापही त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली आहेत. त्या टोमॅटोतून आणखी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास दोघांनीही व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी