शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 6:29 PM

Corona Vaccine : दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे.

वाशिम : कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. याकरिता त्यांच्याकडे कोव्हीन पोर्टलवरील लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. याबाबतचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १६ जुलै रोजी जारी केला.

कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतरही यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोरोना चाचणी आवश्यक होती. आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. मात्र, मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे आदी कोरोना-१९ नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस