गाडी आली, पळा.पळा!

By Admin | Updated: December 18, 2015 02:32 IST2015-12-18T02:32:22+5:302015-12-18T02:32:22+5:30

वाशिम जिल्हय़ात गुड मॉर्निंग पथक सक्रिय; उघड्यावर शौचास जाणा-यांची तारांबळ.

There was a train, run. Play! | गाडी आली, पळा.पळा!

गाडी आली, पळा.पळा!

नंदकिशोर नारे / वाशिम: उघड्यावर शौचास बसल्याने होत असलेल्या आजारांची कल्पना असतानाही अनेक जण उघड्यावर शौचास बसताना दिसून येतात. यावर पायबंद घालण्यासाठी जिल्हय़ात गुड मॉर्निंंंग पथक सक्रिय करण्यात आले आहे. या पथकामुळे उघड्यावर शौचास जाणार्‍यांची भंबेरी उडाली असून, गाडी आल्याबरोबर विधी न उरकताच ह्यगाडी आली, पळा..पळाह्ण म्हणण्याची वेळ उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर आली आहे. जिल्हय़ात गत तीन दिवसांपासून उघड्यावर शौचास जाणार्‍यांना प्रतिबंध करुन त्यांना शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्यावतिने स्वच्छता भारत मिशनचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक १५ डिसेंबर पासून जिल्हयातील प्रत्येक गावे पिंजुन उघडयावर शौचास जाणार्‍यांना पकडून त्यांना उघडयावर शौचास बसण्यापासून होणारे आजाराबाबत माहिती देत आहेत. पुन्हा त्या गावात असा प्रकार आढळून आल्यास त्यांचे नाव, पत्ता व ईतर माहिती घेवून त्यांना असा प्रकार पुन्हा घडल्यास दंडात्मक कारवाई केल्या जाणार असल्याच्या सूचना दिल्या जात आहेत. गत तीन दिवसात शेकडो शौचास पाणी नेणारे भांडे जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम १६, १७ (ग,घ) नुसार उघडयावर शौचास दंडनीय गुन्हा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यन्वित करण्यात आलेल्या गुडमॉर्निंंंग पथकाने आतापर्यंंंत साखरा, भोयता, ईरळा, अमानी या गावांना भेटी देवून शेकडो जणांना पकडून उघडयावर शौचास न जाण्याच्या सूचना केल्यात. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या नेतृत्वात स्वच्छता भारत मिशनचे राजु सरतापे, राम ङ्म्रृंगारे, शंकर आंबेकर, प्रफुल काळे, रविचंद्र पडधान, संदिप ठोंबरे, विजय नागे, अभय तायडे, राऊत, महाले, सुखदेव पडघान, नागेश थोरात यांच्यावतिने गावागावात जावून जनजागृती केल्या जात आहे.

Web Title: There was a train, run. Play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.