ज्वारीच्या पेरणीकडे शेतक-यांनी फिरविली पाठ
By Admin | Updated: September 30, 2014 01:39 IST2014-09-30T01:39:08+5:302014-09-30T01:39:08+5:30
वाशिम जिल्ह्यात क्षेत्र घटल्याने वैरणाची टंचाई : पेरणीत दरवर्षी घट, ज्वारीचा हुरडा होतोय नामशेष.

ज्वारीच्या पेरणीकडे शेतक-यांनी फिरविली पाठ
वाशिम : बदलत्या काळाने जिल्हय़ातील मुख्य पिकांखालील क्षेत्रातही कमालीचे फेरबदल घडवून आणले आहेत. अधिकाधिक उत्पादन देणारी नवनवी पिके आल्याने ह्यजुनं ते सोनंह्ण असणार्या िपकांखालील क्षेत्रात झपाट्याने घट होत असल्यावर जिल्हय़ाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीने शि क्कामोर्तब केले आहे. गत पाच वर्षात खरीप व रब्बीच्या ज्वारी पेर्यात कमालीची घट झाल्याने परिणामी, चाराटंचाईतही भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जात होते. २0१0-११ या वर्षात खरीप ज्वारीखालील क्षेत्र २२ हजार २७0 हेक्टर तर रब्बी ज्वारी ४५९ हेक्टरवर होती. २0११-१२ मध्ये खरीप ज्वारी १७ हजार ५६५ तर रब्बी ज्वारी १७५ हेक्टरपर्यंत खाली घसरली. २0१२-१३ मध्ये कृषी विभागाने ज्वारीबाबत जनजागृती केल्याने पेरा किंचित वाढला. त्यानंतर २0१३-१४ मध्ये खरी प १४ हजार ९८१ तर रब्बी ३६९ हेक्टर आणि २0१४-१५ मध्ये खरीप ज्वारीच्या क्षेत्रात १0 हजार ३४ हेक्टरपर्यंत चिंताजनक घट झाली. रब्बीची पेरणी होणे अजून बाकी आहे; मात्र हा आकडा ग तवर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पूर्वी कोणत्याही खेड्यात गेले की गावाच्या बाहेर कडब्याच्या सुड्या लागलेल्या दिसत होत्या; परंतु आता गावात वैरणच दिसत नाही. जनावरांना सोयाबीनचे कुटार खाऊ घालण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.