शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:38 AM

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच ...

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच नियमित अभ्यासांचे धडे शिकविण्यासाठी शाळेतील वर्गशिक्षकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे, परंतु अनेक शाळांमधील शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहिल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण जाणार नाही. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षक हे मुख्यालयी राहत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात समन्वय राहत होता. काही अडचणी असल्यास विद्यार्थी शिक्षकांच्या घरी जाऊन त्या सोडून घेत होते, परंतु मागील काही वर्षापासून अनेक शिक्षकांनी शहरात राहणे पसंत केल्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांना दुसऱ्या दिवशी शिक्षक गावात येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

-----------

नियंत्रण मिळविणार कोण?

रिसोड तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शहरात राहणे पसंत केले आहे, परंतु ज्या शाळेत ते शिक्षणाचे धडे शिकवत आहेत त्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. त्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रस्ते खराब असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यास उशीर होत असतो, परंतु शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षक अपडाऊन करत असल्यामुळे कोणीच यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत नाहीत.

------------------

कोट : शिक्षकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. त्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यासाठी शाळा समितीने पुढाकार घ्यावा, तसेच पालकांनीही तक्रारी केल्यास यावर निश्चित उपाययोजना करता येतील.

- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. वाशिम