शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा आधार; जिल्ह्याला ५० कोटींचा बुस्टर

By दिनेश पठाडे | Updated: October 4, 2023 15:26 IST

६३ हजार ६२३ शेतकऱ्यांना मिळणार पीक नुकसानभरपाई

दिनेश पठाडेवाशिम : राज्यात जून आणि जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. वाशिम जिल्ह्यातही जुलैच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. पुरामुळे जमिनीही खरडून गेल्या होत्या. बाधित शेतकऱ्यांचे लक्ष मदतीकडे लागले होते. अखेर राज्य शासनाने ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे  कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.  यात जिरायती, बागायती, फळ पिकांसह नदी, नाल्यांना पूर आल्याने शेतात गाळ साचून पिकांचे नुकसान झाले तसेच जमीन खरडून गेले होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने बाधित भागात पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. संयुक्त पंचनामे करुन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने ऑगस्टमध्ये राज्य शासनाकडे  निधीची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये  ५५ हजार २९७.६१  हेक्टरवरील क्षेत्रावरील पीक नुकसानासाठी ६० हजार १६५ शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी १४ लाख ७ हजार १८५ रुपये मंजूर झाले तर १ हजार ९२९.०९ हेक्टरवरील शेतजमिनीच्या नुकसानापोटी ३ हजार ४५८ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शासनाकडून लवकरच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. रब्बी हंगामापूर्वीच मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :RainपाऊसwashimवाशिमFarmerशेतकरी