शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

By ram.deshpande | Published: July 25, 2017 8:00 PM

मानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

ठळक मुद्देशहरातील मुख्य मार्गावरून निघाली वृक्षदिंडीविद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.सदर वृक्षदिंडी पंचायत समितीपासून शहरातील मुख्य मार्गावर निघाली. वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांच्या हाती वृक्षाचे रोपे, फलक होते. झाडे जगवा, झाडे लावा, असे नारे विद्यार्थी देत होते. वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. असा संदेश देणारी फलके आकर्षीत करुन घेत होती. वृक्षदिंडीचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण होते. प्राचार्य डॉ.एन. एस. ठाकरे, नायब तहसीलदार प्रकाश खाटीक, डॉ. इकबाल खान, प्रा. आर. के .ठाकरे, प्रा.एम.पी. ठाकरे, प्रा.पि. डी. राऊत, प्रा. डॉ.निळे, प्रा. पि. एन .कांबळे, प्रा. आर .टी .ब्राम्हण, प्रा. सुनिल काळे यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणातून तहसीलदार चव्हाण म्हणाले की, वृक्षसंवर्धनाचा व वृक्ष लागवडीचा उद्देश समाजाला समजला पाहिजे यासाठी महाविद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी काढली ती प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी प्राचार्य ठाकरे यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रोपे तयार करुन ती लावावी आणि त्याचे संगोपन करण्याचा ध्यास घेतला आहे. यावर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी किमान एक हजार झाडे लावतील तसेच स्वच्छता अभियानांतर्गत कार्य सुरु आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना समाज कार्याची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश आहे. प्रास्ताविक भाषण प्रा.हेमंत चव्हाण यांनी केले ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा जो वसा घेतला तो अभिनंदनीय आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.पंकज राऊत यांनी केले. आभार प्रा.एम.पी.ठाकरे यांनी केले. वृक्षदिंडीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.