हरतालिका : वनस्पतींची दुकाने थाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:34+5:302021-09-09T04:49:34+5:30
वाशिम : हरतालिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून ...

हरतालिका : वनस्पतींची दुकाने थाटली
वाशिम : हरतालिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वतीदेवीने हे व्रत केले होते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी खास पूजा केली जाते. याकरिता वनस्पतींचे पूजनाला महत्त्व आहे. या वर्षी बाजारात जागाेजागी वनस्पती विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत, परंतु पेट्राेल दरवाढीचा फटका या वनस्पती विक्रीवरही दिसून आला आहे.
पूर्वी महिला शेतात जाऊन विविध झाडांची पाने ताेडून (वनस्पती) आणायची. आता बाजारात विकत मिळत असल्याने काेणी शेतात जाताना दिसून येत नाही. या वर्षी वाशिम शहरात विविध फुले, फळ व वनस्पती विक्रीची दुकाने थाटली असली तरी अव्वाच्या सव्वा भावामुळे महिलांचे बजेट काेलमडले आहे. बेलपुडा ५ रुपयांना मिळायचा, आता ताे १५ रुपयांमध्ये घेण्याची वेळ महिलांवर आली आहे. तसेच इतरही पूजेच्या साहित्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले.
शहरात असे आहेत वनस्पतींचे/साहित्य दर
आंब्याच्या झाडांची पान : ५ रुपये
सिताफळ पाने व फळ : १५ रुपये
मका कणीस : १० रुपये
केळीचे पान : २० रुपये
विड्याची पाने : १ रुपयाला १
एकत्रित वनस्पती पुडा : १०० रुपये
सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, रांगोळी,पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा यासह इतर साहित्याचे भाव वाढले आहेत.