शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

इंझोरीतील साठवण तळ्याचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 3:46 PM

या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. 

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम): राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून इंझोरी येथे सन २०१८-१९ मध्ये साठवण तळे मंजूर झाले; परंतु हे साठवण तळे पूर्ण होऊ शकले नाही. आता या अर्धवट तळ्यात लाखो लिटरचा जलसाठा होत असल्याने भूजल पातळीला आधार झाला असला तरी, या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात  २०१८-१९ मध्ये सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पाणलोटाची अनेक कामे करण्यात आली. त्यात नाला खोलीकरण, नदी खोलीकरण सलग समतल चर, नालाबांधासह जवळपास ४८  साठवण तळेही प्रस्तावित करण्यात आले होते. या कामांसाठी बीजेएसने आवश्यकतेनुसार जेसीबी, पोकलन मशीन उपलब्ध करून दिल्या, तर शासनाकडून इंधनाचा खर्च देण्यात येत होता; परंतु साठवण तळ्यांचे खोदकाम शासनाच्या निर्धारित इंधन दरात पूर्ण होणे कठीण असल्याने अनेक ठिकाणचे तळे अर्धवटच राहिले. त्यात इंझोरी येथील तळ्याचाही समावेश होता. तब्बल शंभर चौरस मीटर आकार आणि तीन मीटर खोल अशा स्वरूपाच्या तळ्याचे काम कृषी विभागाने सुरू केले. चारही बाजूनी दोन मीटर रुंद आणि तीन मीटर खोल नाल्या खोदल्यानंतर मात्र इंधन दराची अडचण निर्माण झाल्याने हे तळे अर्धवटच राहिले. तथापि, त्याच वर्षी पावसाळ्यात या अर्धवट शेततळ्यात लाखो लिटरचा जलसाठा झाला. त्यामुळे परिसरातील भूजल पातळीसह विहिरींच्या पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत सिंचनास आधार झाला. तथापि, या साठवण तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांत गुरे पडण्याच्या घटनाही घडू लागल्या. त्यामुळे पशूपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.   महामार्गाच्या माध्यमातून काम करण्याची मागणी जिल्ह्यात समृद्धी महामार्गासह विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील गौण खनिजाची पूर्तता करण्यासाठी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात शंभर चौरस मीटर आकाराचे साठवण तळेही झाले असून, त्याचा फायदा संबंधित गावातील शेतकºयांना होत आहेच शिवाय भूजल पातळी वाढून पाणीटंचाईचा प्रश्नही मिटला आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या कारंजा-मानोरा महामार्गाच्या माध्यमातून या साठवण तळ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी इंझोरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम