शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:13 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील दळणवळण सुविधा अद्ययावत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांसह काही जिल्हामार्गांची कामे करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे. खडी, मुरूम या गौणखनिज त्यामुळे उघडे पडत असून, याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. जिल्ह्यात वाशिम-कारंजा, महान-मानोरा, कारंजा-मानोरा, मालेगाव-मेहकर हे राष्ट्रीय महामार्ग, तसेच शेलुबाजार ते वाशिमसह काही जिल्हा मार्गांचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे; परंतु जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक प्रकल्पांत ठणठणाट असल्याने जनतेचीच तहान भागणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गाच्या कामासाठी पाणी आणावे कोठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांची कामे रासायनिक द्रव्याच्या वापराने होत असल्याने या कामांत पाण्याची आवश्यकता खूप कमी आहे; परंतु या मार्गासाठीचे समतलीकरण आणि जिल्हा मार्गाच्या समतलीकरण प्रक्रियेत गौणखनिजाची योग्य दबाई करणे आवश्यक असून, यासाठीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या अडचण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी, मुरूम उघडा पडत आहेच शिवाय मोठ्या प्रमाणात धुळही उडत आहे. याचा त्रास वाहनधारक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे; परंतु आवश्यक प्रमाणात पाणीच नसल्याने ही समस्या दूर करून कामांचा दर्जा सुधारावा कसा, असा प्रश्न कंत्राटदारांनाही पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई