शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:13 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील दळणवळण सुविधा अद्ययावत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांसह काही जिल्हामार्गांची कामे करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे. खडी, मुरूम या गौणखनिज त्यामुळे उघडे पडत असून, याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. जिल्ह्यात वाशिम-कारंजा, महान-मानोरा, कारंजा-मानोरा, मालेगाव-मेहकर हे राष्ट्रीय महामार्ग, तसेच शेलुबाजार ते वाशिमसह काही जिल्हा मार्गांचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे; परंतु जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक प्रकल्पांत ठणठणाट असल्याने जनतेचीच तहान भागणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गाच्या कामासाठी पाणी आणावे कोठून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गांची कामे रासायनिक द्रव्याच्या वापराने होत असल्याने या कामांत पाण्याची आवश्यकता खूप कमी आहे; परंतु या मार्गासाठीचे समतलीकरण आणि जिल्हा मार्गाच्या समतलीकरण प्रक्रियेत गौणखनिजाची योग्य दबाई करणे आवश्यक असून, यासाठीच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या अडचण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडी, मुरूम उघडा पडत आहेच शिवाय मोठ्या प्रमाणात धुळही उडत आहे. याचा त्रास वाहनधारक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे; परंतु आवश्यक प्रमाणात पाणीच नसल्याने ही समस्या दूर करून कामांचा दर्जा सुधारावा कसा, असा प्रश्न कंत्राटदारांनाही पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई