शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

एसटीचे वाहकच ठरू नयेत कोरोनाचे वाहक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST

वाशिम : एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास असल्याचे मानले जाते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटीत शारीरिक अंतराचा नियम ...

वाशिम : एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास असल्याचे मानले जाते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटीत शारीरिक अंतराचा नियम पाळणे अशक्य असल्याने हा प्रवास धोकादायक ठरू पाहत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे दैनंदिन शेकडो प्रवाशांशी शारीरिक स्पर्श करीत प्रत्यक्ष संबंध येत असलेल्या वाहकांना ना चांगल्या दर्जाचे मास्क आहे, ना त्यांचा कोरोना योद्धा म्हणून लसीकरणासाठी विचार झालेला आहे. त्यामुळे एसटीचे वाहकच कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, रिसोड आणि कारंजा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहेत. तसेच मालेगाव आणि मानोरा येथे उपआगार कार्यान्वित आहे. प्राप्त माहितीनुसार, वाशिम आगारांतर्गत १२० वाहक कार्यरत असून ४५ एसटी बसेसच्या माध्यमातून दैनंदिन १,५०० ते १,६०० प्रवासी प्रवास करतात. मंगरूळपीर आगारांतर्गत ४५ वाहक, ४५ एसटी बस असून दैनंदिन ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. रिसोडमध्ये ८९ वाहक कार्यरत आहेत. या आगारांतर्गत दैनंदिन ४३ एसटी बस धावतात. १,३०० ते १,४०० प्रवासी एसटीने प्रवास करतात; तर कारंजा आगारांतर्गत ४० एसटी बस असून ९० वाहक कार्यरत आहेत. तसेच एसटीने दैनंदिन प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या १००० आहे.

याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ३४४ वाहकांचा सुमारे ३,६०० वेगवेगळ्या प्रवाशांशी रोजचा जवळचा संबंध येत आहे. असे असताना वाहकांना आगार व्यवस्थापनाने कुठलीच सुविधा पुरविलेली नाही. तोंडाला मास्क लावायचे तर ते स्वत:च्या पैशाने विकत घ्यावे लागत आहे. वाहकांच्या कोरोना चाचणीबाबत कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत किंवा त्यांचे लसीकरण करून घेण्याचेही प्रशासनाला गरजेचे वाटलेले नाही. त्यामुळे वाहकांचा जीव धोक्यात सापडला असून त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

....................

बॉक्स :

३४४ वाहकांचा दैनंदिन ३,६०० प्रवाशांशी संपर्क

वाशिम - १२० वाहक, ४५ फे-या, १६०० दैनंदिन प्रवासी

मंगरूळपीर - ४५ वाहक, २५ फे-या, ५०० दैनंदिन प्रवासी

रिसोड - ८९ वाहक, ४३ फे-या, १,५०० दैनंदिन प्रवासी

कारंजा - ८४ वाहक, ४० एसटी बस, १००० दैनंदिन प्रवासी

..................

कोट :

नोकरी टिकवायची तर एसटीत ठरावीक वेळेनुसार चढावेच लागते. स्वत:ची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क वापरत आहे; मात्र ते पुरेसे नाही. कारण एसटीच्या प्रवासात तिकीट देऊन पैसे घेत असताना कुठला प्रवासी कसा, हे कळत नाही. प्रशासनाने किमान सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा आहे.

- संजय नाईक, वाहक