शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’; नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 15:00 IST

प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेलुबाजार येथील अडाण नदीला पुर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार: गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सोनल प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून, या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आता शेलुबाजार येथील अडाण नदीलाही पूर आला आहे. या पुरामुळे दोन दिवसांपासून आठवडी बाजारातील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील ग्रामस्थांची वहिवाट बंद झाली आहे.मंगरुळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातच पावसाने गेल्या १५ दिवसांपासून ठाण मांडले आहे. या पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्या यंदा हद्दपार झाली आहे, तर रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विश्वास वाटू लागला आहे. यात मालेगाव तालुक्यात असलेल्या; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगननजिक असलेला सोनल प्रकल्प दहा दिवसांपूर्वीच ओव्हर फलो झाला होता. आता पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने आणि त्यातच गत दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्याने या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेलुबाजार येथील अडाण नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी शेलुबाजार येथील आठवडी बाजारात असलेल्या पुलावरून वाहू लागले आहे. सोमवारी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे या पुलावरील ग्रामस्थांची वहिवाटच बंद झाली. सोमवारी सायंकाळपर्यंतही या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याचा परिणाम ग्रामीण जनजिवनावर झाला.नद्या, नालेही वाहताहेत दूथडी भरूनमालेगाव तालुक्यातून वाहणारी काटेपूर्णा नदी पावसाळा उलटल्यानंतरही कोरडीच होती; परंतु गत १० ते १५ दिवसांपासून पडत पडलेल्या सततच्या पाण्याने काटेपूर्णा नदी आता दुथडी भरून वाहत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील लहानसहान नद्या आणि नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजासह रिसोड आणि वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांतही पावसामुळे अनेक नद्या, नाल्यांचे पात्र फुगल्याचे सोमवारी दिसून आले. पावसाची अशीच रिपरिप कायम राहिली, तर ग्रामीण भागातील नदी, नाल्यांच्या काठावरील शेतजमिनींचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आणखीच मोठे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसDamधरण