‘थीम बेस’साठी सामाजिक वनीकरणने निधी दिलाच नाही
By Admin | Updated: March 13, 2015 01:52 IST2015-03-13T01:52:10+5:302015-03-13T01:52:10+5:30
सत्र संपले; शाळांना निधी मिळालाच नाही

‘थीम बेस’साठी सामाजिक वनीकरणने निधी दिलाच नाही
वाशिम : सामाजिक वनीकरण ुविभागाच्यावतीने राज्यभरातील शाळांमध्ये पर्यावरणाचे संवर्धन होण्याकरिता ह्यथीम बेसह्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता शाळांना सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने तीन ते पाच हजारांचे अनुदान देण्यात येते; मात्र यावर्षीचे सत्र संपत आले असले तरी अद्याप शाळांना ही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे यावर्षी शाळांना पर्यावरण संवर्धनाचे कार्य करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शाळांमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय हरित सेना स्थापन करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. याकरिता प्रत्येक शाळेला २0१४ - १५ करिता अडीच हजार रुपये अनुदान देण्यात येते. तसेच या व्यतिरिक्त या शाळांमध्ये थीम बेस कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रम राबविण्याकरिता शाळेच्या कार्यानुसार तीन ते पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, २0१४ - १५ वर्षातील सत्र संपत आले तरी यावर्षीचे अनुदान अद्याप शाळांना मिळाले नाही. त्यामुळे सदर कार्यक्रम शाळा केव्हा राबवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. थीम बेस अंतर्गत डिस्पोजल ग्लासमध्ये लहान रोपटे तयार करणे, शाळा व शाळेच्या परिसरातील वृक्षांची नोंद घेणे, त्यांचे छायाचित्र काढणे, जुन्या कपड्यांच्या पिशव्या तयार करणे, विविध वृक्षांचे बीज संकलन करणे, सेंद्रिय खत तयार करणे, गांडूळ खत तयार करणे, शाळा व आसपासच्या परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित करणे, त्यांचे छायाचित्र काढून संकलित करणे, पर्यावरणपूरक सण साजरे करणे आदी उपक्रम राबविण्यात येतात. राष्ट्रीय हरित सेना असलेल्या प्रत्येक शाळेला दरवर्षी अडीच हजार रुपयांचा निधी देण्यात येतो. हा निधी सामाजिक वनीकरणच्या कार्यालयात प्राप्त झाला आहे. हा निधी यावर्षीपासून शाळांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. शाळांनी सामाजिक वनीकरणच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.