शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

वाशिम जिल्ह्यात केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:33 IST

गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपशाचे काम पूर्ण होऊ शकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांची जमीन सुपिक व्हावी आणि प्रकल्पाची साठवण क्षमताही वाढावी, या उद्देशाने जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ उपसा करण्यासाठी ७३ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; परंतु यातील केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपशाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. त्यामुळे या अभियानाचा यंदा म्हणवा तेवढा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात यंदा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत सहा तालुक्यातील मिळून ७९ प्रकल्पांतील गाळ उपसा करण्याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७३ प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. शेतकºयांना या प्रकल्पातील गाळ शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार होता, तर गाळ उपशामुळे प्रकल्पांची खोली वाढून जलसाठ्यात मोठी वाढ होणार होती. तथापि, मंजूर करण्यात आलेल्या ७३ प्रस्तावांपैकी केवळ ५० प्रकल्पांतील गाळ उपशाच्या कामाला सुरुवात होऊ शकली आणि त्यातील केवळ ७ प्रकल्पांतील गाळाचा उपसा होऊ शकला. यात मालेगाव तालुक्यातील एका प्रकल्पातून ३० हजार घनमीटर, वाशिम तालुक्यातील ५ प्रकल्पांतून ७० हजार ८०८ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील एका प्रकल्पातील गाळ उपशाचे कामही पूर्ण करण्यात आले. दरम्यान मानोरा तालुक्यातील तीन प्रकल्पांत काम सुरू करण्यात आल्यानंतर या प्रकल्पांतून ३३ हजार ५० घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. प्रकल्पातील ओलाव्यामुळे सुरुवातीच्या काळात हे अभियान राबविण्यात अडचणी निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील एक, मंगरुळपीर तालुक्यातील दोन आणि मानोरा तालुक्यातील तीन प्रकल्पातील गाळ उपशाचे काम प्रगतीपथावर आहे. २३ प्रकल्पांची कामे सुरुच झाली नाही !जिल्ह्यात उपविभागीय स्तरावरून ७३ प्रकल्पांतील गाळ उपशाच्या कामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ५० प्रकल्पांत कामाला सुरुवात तरी, केवळ ७ प्रकल्पांतील गाळाचा उपसा झाला, ६ प्रकल्पांतील गाळाचा उपसा सुरू आहे, तर १८ प्रकल्पांचे काम बंद करण्यात आले आहे. उर्वरित २३ प्रकल्पांत गाळ उपशाचे काम सुरू होऊ शकले नाही. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून, प्रकल्पात पुन्हा पाण्याचा संचय सुरू झाला आहे किंवा गाळात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रगतीपथावर असलेली कामेही प्रलंबित राहून केलेला खर्च व्यर्थ ठरणार असल्याचे दिसत आहे.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांपैकी ५० हून अधिक प्रकल्पांची कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ७ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून, इतर १४ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या कामांसाठी शेतकºयांचा प्रतिसाद न लाभल्याने कामे पूर्ण करण्यात अडथळा आला.-लक्ष्मण मापारीउपकार्यकारी अभियंताजलसंधारण विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरण