शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 2:47 PM

रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याचे दिसते; परंतु विविध नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला. रब्बीतही भारनियमनाचा खोडा असल्याने शेतीची कामे मिळेनासी झाली, तर रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात रोजगाराचा सर्वात मुख्य मार्ग हा शेतीवर आधारित आहे. उद्योग धंद्यांचा अभाव, विकासाची संथगती आदिंमुळे इतर कामांची उपलब्धताही नाही. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामावरच शेतकरी आणि शेतमजुरांची भिस्त असते. जिल्ह्यात पावसाची अनियमितता नेहमीच पाहायला मिळते. त्यातच विविध नैसर्गिक संकटांचा परिणाम शेतीपिकांवर होतो. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घट होत आहे. याचा परिणाम शेतीश्ी निगडित उद्योगधंद्यांवर होतो. त्यामुळेच खरीप हंगाम संपला की, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होतो. यंदाही ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामाला बसल्यानंतर रब्बी हंगामात भारनियमनाचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीमधील कामे बंद पडली असून, शेतीवर अवलंबून असलेले कामगार रोजगारासाठी परप्रांतात धाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील अनेक गावे यामुळे निम्म्याहून अधिक रिकामी झाली असताना आता इतरही तालुक्यातील शेतमजूर कुटुंबासह परप्रांतात कामाच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोगलदरी परिसरातील शेकडो घरांना टाळेमंगरुळपीर तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर कामे मिळेनासी झाली असून, शेतीवर अवलंबून असलेले शेकडो शेतमजुरांनी रोजगारासाठी पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि गुजरात, मध्यप्रदेशासारख्या राज्यात स्थलांतर केले आहे. एकट्या जोगलदरी येथील ५० घरांना टाळे ठोकून कामगार मुलाबाळांसह परप्रांतात गेले आहेत, तर साळंबी, कोळंबी, दाभा, कवठळ, कोठारी, चेहेल आदि ठिकाणचे अनेक मजुर परप्रांतात घराला टाळे ठोकून गेले आहेत. प्रामुख्याने उसतोडणीच्या कामाची निवड कामगारांनी केल्याचे या संदर्भातील माहितीवरून कळले आहे.

टॅग्स :washimवाशिम